शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:48 IST

आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस दुसरी फेरी, गटशिक्षणाधिकारी रजेवर गेल्याने तीन दिवस प्रक्रिया खोळंबली

नांदेड : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़ त्यांच्या गैरहजेरीत संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे शेवटच्या दिवशी पालकांची प्रमाणपत्र पडताळणीसाठी धावपळ उडणार आहे़ प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून दुसºया फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची मुदत गुरूवारी संपत आहे़ ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे़ अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केली जात आहे़ मात्र, गेल्या चार दिवसांपासून गटशिक्षणाधिकारी रूस्तुम आडे हे रजेवर आहेत़ या दरम्यान अनेक पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत होते़ मात्र त्यांच्या गैरहजेरीत कोणताही अधिकारी ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पुढे येत नव्हता़ त्यामुळे पालकांना परत जावे लागत होते़ बुधवारी काही संतप्त पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात जाऊन आमच्या मुलांचे प्रवेश न झाल्यास कोण जिम्मेदार राहणार, शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्य आहे का, असे प्रश्न विचारून संबंधितांना धारेवर धरले़मागील चार दिवसांपासून आम्ही पंचायत समितीला चकरा मारत आहोत. मात्र या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी नसल्याने आमचे काम झाले नाही़ सध्या पेरणीचे दिवस असून शेतातील कामे सोडून आम्ही या कामासाठी दिवसभर या कार्यालयात थांबत आहोत़ रजेच्या काळात एखादा अधिकारी या कामासाठी नियुक्त करणे गरजेचे असल्याचे पालकांनी सांगितले़ दरम्यान, पंचायत समिती सभापती सुखदेव जाधव यांनी गुरूवारी शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या़पहिल्या फेरीत २३२५ विद्यार्थी निवडलेआरटीईअंतर्गत २५ टक्के कोट्यातून पहिल्या फेरीत २ हजार ३२५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती़ त्यापैकी १ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ ५ अपात्र झाले असून ६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही़ पहिल्या फेरीत एकूण ३ हजार २५१ प्रवेशक्षमता होती़ तर ३२३८ जागा रिक्त होत्या़जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१८ जागा आहेत़ त्यापैकी २५ टक्के कोट्यातील ३ हजार २५१ जागा आरटीईसाठी आहेत़ गरिबांच्या मुलांना मोठ्या शाळेत प्रवेश मिळत आहे़नांदेड शहरात ६१९ जणांचे प्रवेशबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थसहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्याची पहिली यादी मे मध्ये जाहीर झाली होती़ नांदेड शहरातील जागांची क्षमता ६३५ होती़ त्यापैकी ६२९ जागेवर ६१९ विद्यार्थी निवडले़ त्यातील २१३ जणांनी प्रवेश घेतला नाही़दुस-या यादीची प्रवेशप्रक्रिया २७ जून रोजी पूर्ण होईल़ त्या नंतर उर्वरित जागेसाठी प्रवेशप्रक्रिया होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली़ शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालक धडपड करीत आहेत़ प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कागदपत्रांची पडताळणी केली जाते़

गटशिक्षणाधिकारी दोन दिवस रजेवर होते़ तसेच बुधवारी ते औरंगाबादला सुनावणीसाठी गेले होते़ त्यामुळे पालकांची गैरसोय झाली़ मात्र २७ जून रोजी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल़ यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ - सुखदेव जाधव, सभापती, पं़ स़ नांदेड

टॅग्स :NandedनांदेडRight To Educationशिक्षण हक्क कायदाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडEducationशिक्षण