शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धर्माबादचा तेलंगणात समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:57 IST

धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगंणात समावेश करण्याची लेखी मागणी केली आहे़ या मागणीमुळे खळबळ उडाली आहे़

ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी : शासन, लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगंणात समावेश करण्याची लेखी मागणी केली आहे़ या मागणीमुळे खळबळ उडाली आहे़धर्माबाद हे शहर तेलगंणाच्या राज्याच्या सीमेवर आहे़ ६० टक्के जनता तेलगू भाषिक असून खरेदी विक्रीसाठी व्यापारी, शेतकरी, शेतमजूर तेलगंणात ये-जा करतात़ महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेपेक्षा तेलगंणातील योजना अनेक पटींनी चांगल्या असल्याचे मत तालुक्यातील जनतेचे झाले आहे़ खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी चार हजार रूपये शासन देत आहे.सदरील योजना महाराष्ट्र शासनानेही राबविण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ तसेच बाभळी बंधाºयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने २२५ कोटी रूपये खर्च करून बंधारा बांधला़ मात्र हा बंधारा फक्त शोभेची वास्तु बनला आहे.महाराष्ट्रातील रस्ते व तेलगंणातील रस्ते यामध्येही जमीन अस्मानचा फरक आहे. निजामाच्या काळात धर्माबाद तालुक्याचा संपूर्ण भाग मुधोळ मंडळमध्ये समावेश होता. आजही जुनी कागदपत्रे मुधोळ तहसीलमधून नागरिक काढून आणत आहेत. योजनांच्या अंमलबजावणीबाबतही तेलंगणा सरस असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम, शंकू पाटील होट्टे यांनी निझामाबादचे आ़ बाल रेड्डी, खा. कविता यांच्याकडे लेखी मागणी करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची झोप उडवली आहे.आगामी विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सदरील मागणीमुळे जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी या मागणीचे स्वागतही केले आहे़ तर काही मात्र विरोधात आहेत़ लवकरच तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असून यात सर्वच राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग राहणार असल्याची प्रतिक्रियाही देण्यात आली़---धर्माबाद हे तेलंगणात समाविष्ट होणे शक्य नसून भाषेची व इतर गोष्टींची समस्या निर्माण होते़ केवळ योजनेसाठी राज्य बदलणे योग्य नाही, त्यापेक्षा तेलंगणातील योजना महाराष्ट्र सरकारने राबवावे हे महत्त्वाचे आहे़ तेलंगणात आताच्या मुख्यमंत्र्यांसारखे भविष्यात मुख्यमंत्री राहतील काय? -गणेशराव पा़ करखेलीकर, माजी सभापती, कृउबा समिती़---धर्माबाद तेलंगणात जाऊ शकत नाही ही स्टंटबाजी आहे़ धर्माबाद हे तेलंगणाच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करीत आहे़ तेलंगणात जाण्यापेक्षा राज्य सरकारवर दबाव आणून विकासाचे मुद्दे मांडणे योग्य राहील -विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष़

 

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाMLAआमदारMember of parliamentखासदार