शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:56 IST

मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजनुकसान भरपाईची केली मागणी

अर्धापूर/पार्डी : मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.तालुक्यात गतवर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला होता़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली़ परिणामी शेतकरी मोठ्या पिकांना फाटा देत लहान पिकाकडे वळले. भाजीपाला व टरबूज पिकाची निवड केली़ या परिसरातील शेतकºयांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील काही दिवसांत सातत्याने थंडीची लाट असल्याने या पिकाच्या वाढीत व फळधारणा वेळी परिणाम दिसून आला. महागड्या औषधीचा प्रयोग केला. फळे बाजारात विक्रीसाठी जाणार तेव्हा थंडीची लाट कायम राहिली़ त्यामुळे भावात मोठी घसरण झाली़या वर्षात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी कमी पाण्यावर व कमी दिवसांत येणाºया पिकाची लागवड करत असून त्यात प्रामुख्याने पालेभाज्या व फळपिकाची निवड करीत आहेत. तालुक्यातील निमगाव, कारवाडी, देळूब व पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज फळाची लागवड केली आहे. हे पीक ९० दिवसांत येते़ भरपूर उत्पादन देणाºया पिकामध्ये टरबुजाचे नाव घेतले जाते. टरबूज पीक सुरुवातीला जोमात होते. जसजशी थंडीची लाट आली तसे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई दिसत होती. शेतक-यांनी मोठ्या मेहनतीवर पीक घेतले. परंतु, मागील काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याने पिकाची व फळाची वाढ खुंटली आहे़ फळे लहान आकाराचे झाले असून टरबुजाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली़ त्यामुळे पिके वजनदार भरत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती केळीच्या बागांची दिसत आहे. केळीच्या पानावर पिवळ्या रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरीकडे पाने करपून गेल्याने वाढ थांबली आहे. त्यामुळे केळीची बाग कोमात गेल्याचे चित्र आहे.नफ्यासाठी केली टरबुजाची लागवडमाझ्याकडे एक एकर जमिनीत टरबुजाची लागवड केली आहे. लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. आता तोडणीच्या वेळी थंडी वाढल्याने फळांची वाढ थांबली आहे़ बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे़ या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती़ परंतु, तसे चित्र दिसत नाही.- पांडुरंग तरोडकर, शेतकरी (पार्डी)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीthunderstormवादळ