शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:56 IST

मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजनुकसान भरपाईची केली मागणी

अर्धापूर/पार्डी : मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.तालुक्यात गतवर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला होता़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली़ परिणामी शेतकरी मोठ्या पिकांना फाटा देत लहान पिकाकडे वळले. भाजीपाला व टरबूज पिकाची निवड केली़ या परिसरातील शेतकºयांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील काही दिवसांत सातत्याने थंडीची लाट असल्याने या पिकाच्या वाढीत व फळधारणा वेळी परिणाम दिसून आला. महागड्या औषधीचा प्रयोग केला. फळे बाजारात विक्रीसाठी जाणार तेव्हा थंडीची लाट कायम राहिली़ त्यामुळे भावात मोठी घसरण झाली़या वर्षात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी कमी पाण्यावर व कमी दिवसांत येणाºया पिकाची लागवड करत असून त्यात प्रामुख्याने पालेभाज्या व फळपिकाची निवड करीत आहेत. तालुक्यातील निमगाव, कारवाडी, देळूब व पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज फळाची लागवड केली आहे. हे पीक ९० दिवसांत येते़ भरपूर उत्पादन देणाºया पिकामध्ये टरबुजाचे नाव घेतले जाते. टरबूज पीक सुरुवातीला जोमात होते. जसजशी थंडीची लाट आली तसे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई दिसत होती. शेतक-यांनी मोठ्या मेहनतीवर पीक घेतले. परंतु, मागील काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याने पिकाची व फळाची वाढ खुंटली आहे़ फळे लहान आकाराचे झाले असून टरबुजाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली़ त्यामुळे पिके वजनदार भरत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती केळीच्या बागांची दिसत आहे. केळीच्या पानावर पिवळ्या रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरीकडे पाने करपून गेल्याने वाढ थांबली आहे. त्यामुळे केळीची बाग कोमात गेल्याचे चित्र आहे.नफ्यासाठी केली टरबुजाची लागवडमाझ्याकडे एक एकर जमिनीत टरबुजाची लागवड केली आहे. लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. आता तोडणीच्या वेळी थंडी वाढल्याने फळांची वाढ थांबली आहे़ बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे़ या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती़ परंतु, तसे चित्र दिसत नाही.- पांडुरंग तरोडकर, शेतकरी (पार्डी)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीthunderstormवादळ