शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:56 IST

मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजनुकसान भरपाईची केली मागणी

अर्धापूर/पार्डी : मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.तालुक्यात गतवर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला होता़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली़ परिणामी शेतकरी मोठ्या पिकांना फाटा देत लहान पिकाकडे वळले. भाजीपाला व टरबूज पिकाची निवड केली़ या परिसरातील शेतकºयांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील काही दिवसांत सातत्याने थंडीची लाट असल्याने या पिकाच्या वाढीत व फळधारणा वेळी परिणाम दिसून आला. महागड्या औषधीचा प्रयोग केला. फळे बाजारात विक्रीसाठी जाणार तेव्हा थंडीची लाट कायम राहिली़ त्यामुळे भावात मोठी घसरण झाली़या वर्षात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी कमी पाण्यावर व कमी दिवसांत येणाºया पिकाची लागवड करत असून त्यात प्रामुख्याने पालेभाज्या व फळपिकाची निवड करीत आहेत. तालुक्यातील निमगाव, कारवाडी, देळूब व पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज फळाची लागवड केली आहे. हे पीक ९० दिवसांत येते़ भरपूर उत्पादन देणाºया पिकामध्ये टरबुजाचे नाव घेतले जाते. टरबूज पीक सुरुवातीला जोमात होते. जसजशी थंडीची लाट आली तसे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई दिसत होती. शेतक-यांनी मोठ्या मेहनतीवर पीक घेतले. परंतु, मागील काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याने पिकाची व फळाची वाढ खुंटली आहे़ फळे लहान आकाराचे झाले असून टरबुजाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली़ त्यामुळे पिके वजनदार भरत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती केळीच्या बागांची दिसत आहे. केळीच्या पानावर पिवळ्या रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरीकडे पाने करपून गेल्याने वाढ थांबली आहे. त्यामुळे केळीची बाग कोमात गेल्याचे चित्र आहे.नफ्यासाठी केली टरबुजाची लागवडमाझ्याकडे एक एकर जमिनीत टरबुजाची लागवड केली आहे. लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. आता तोडणीच्या वेळी थंडी वाढल्याने फळांची वाढ थांबली आहे़ बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे़ या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती़ परंतु, तसे चित्र दिसत नाही.- पांडुरंग तरोडकर, शेतकरी (पार्डी)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीthunderstormवादळ