शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

शाळांना कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:01 IST

सर्वांसाठी मोफत शिक्षण व अनिवार्य शिक्षण कायदा (आरटीई) अंतर्गत विद्यार्थ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मागील वर्षी अनेक संस्थासंचालकांच्या उदासीनतेमुळे एक हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश राज्य शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेला दिले आहेत़

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे निर्देश : खबरदार! आरटीईचे उल्लंघन कराल तर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सर्वांसाठी मोफत शिक्षण व अनिवार्य शिक्षण कायदा (आरटीई) अंतर्गत विद्यार्थ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मागील वर्षी अनेक संस्थासंचालकांच्या उदासीनतेमुळे एक हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश राज्य शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेला दिले आहेत़शिक्षण विभागाच्या वतीने आरटीईनुसार २३४ शाळांतील राखीव ३ हजार ३२९ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. परंतु, गतवर्षी संस्थाचालकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे एक हजार २५४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आरटीईचे उल्लंघन करणाºया शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर आता सर्वच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला संबंधित शाळांची यादी तयार करून राज्य शिक्षण विभागाला पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण तीन हजार ३२९ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानुसार अर्धापूर तहसीलमधील १५ शाळांमध्ये २०५, भोकर येथील ५ शाळांमध्ये ६२, बिलोलीतील ११ शाळांमध्ये २०१, देगलुरातील १३ शाळांमध्ये १९७, धर्माबादच्या ९ शाळांमधील ९४, हदगाव येथील ७ शाळांमधील ६३, हिमायतनगरच्या ४ शाळामध्ये ९९, कंधारच्या ८ शाळांमध्ये ९९, किनवट येथील १४ शाळांमध्ये ११२, लोहा येथील १७ शाळांमध्ये १२०, माहूर येथील ४ शाळांमध्ये ३५, मुदखेड येािील १२ शाळांमध्ये १८२ जागा, मुखेडच्या १० शाळांमधील ११५ जागा, नायगाव येथील १९ शाळांत ३१० तर नांदेड तालुक्यातील ४३ शाळांतील ६११ जागा आणि नांदेड शहरातील ३८ शाळांतील ६३१ जागा तसेच उमरी तालुक्यातील ५ शाळांतील ५२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.गतवर्षी हजारांवर जागा होत्या रिक्तगतवर्षी आरटीईनुसार जिल्ह्यातील २१० इंग्रजी शाळांमध्ये आरक्षित दोन हजार ८६० जागांसाठी विद्यार्थ्यांकडून फॉर्म मागविण्यात आले. त्यामध्ये एकूण तीन हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ‘आरटीई’ साठी फॉर्म भरले होते. त्यातील केवळ एक हजार ६०६ विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला गेला. तर उर्वरित एक हजार २५४ जागांसाठी संबंधित विभागाला फेºया घ्याव्या लागल्या होत्या. जून २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंत चाललेल्या प्रवेश प्रक्रियेनंतरही एक हजार २५४ जागा रिक्त होत्या.