शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

पाण्याचा अपव्यय करणाऱ्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:40 IST

विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.

ठळक मुद्देपाणीटंचाई : महापालिकेने केली दोन विशेष पथकांची स्थापनापहिल्या दिवशी दिली समज

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.जिल्ह्यात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यात विष्णूपुरी प्रकल्पातील पाण्याचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने नांदेड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा वेळीच न रोखल्याने विशेषत: दक्षिण नांदेडवर तीव्र जलसंकट ओढवले आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. भविष्यात शहराला लागणारा पाणीसाठा आणि उपलब्ध जलसाठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे आहे त्या पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे झाले आहे.शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवलेले असताना शहरातील काही भागांत मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब पुढे आली आहे. विविध ठिकाणी पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, घरासमोरील रस्ता धुण्यासाठी, मिनरल वॉटर प्लान्टसाठी तसेच अन्य बाबींसाठी पाण्याचा मोठा अपव्यय सुरू होता.पाण्याचा सुरू असलेला अपव्यय थांबवण्यासाठी महापालिकेने उत्तर नांदेड आणि दक्षिण नांदेडसाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. हे पथक शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध कारवाई करणार आहे. प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पथकाने कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.उत्तर नांदेडच्या पथकाची जबाबदारी मालमत्ता व्यवस्थापक राजेश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या पथकात साहेबराव जाधव, हरदीपसिंघ सुखमणी, अनिल जोशी, भिवाजी वडजे, मोतीराम गवळे, संजय गितले, आनंद कांबळे यासह मनपा पोलीस पथकातील एका कर्मचाºयाचा समावेश राहणार आहे.दक्षिण नांदेडमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी हे पथक प्रमुख राहणार आहेत. या पथकात राजेंद्र सरपाते, आयुब खान, गणपत भुरे, शेख खदीर, बाबूराव ढोले, अरुण कठाडे तसेच एका पोलीस कर्मचा-याचा समावेश राहणार आहे.या पथकांनी मंगळवारी विविध भागात भेटी दिल्या. पहिल्या दिवशी समज दिल्याचे पथकप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका