शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाण्याचा अपव्यय करणाऱ्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:40 IST

विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.

ठळक मुद्देपाणीटंचाई : महापालिकेने केली दोन विशेष पथकांची स्थापनापहिल्या दिवशी दिली समज

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत.जिल्ह्यात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यात विष्णूपुरी प्रकल्पातील पाण्याचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने नांदेड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा वेळीच न रोखल्याने विशेषत: दक्षिण नांदेडवर तीव्र जलसंकट ओढवले आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. भविष्यात शहराला लागणारा पाणीसाठा आणि उपलब्ध जलसाठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे आहे त्या पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे झाले आहे.शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवलेले असताना शहरातील काही भागांत मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब पुढे आली आहे. विविध ठिकाणी पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, घरासमोरील रस्ता धुण्यासाठी, मिनरल वॉटर प्लान्टसाठी तसेच अन्य बाबींसाठी पाण्याचा मोठा अपव्यय सुरू होता.पाण्याचा सुरू असलेला अपव्यय थांबवण्यासाठी महापालिकेने उत्तर नांदेड आणि दक्षिण नांदेडसाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. हे पथक शहरात पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध कारवाई करणार आहे. प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पथकाने कारवाईचा अहवाल दररोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.उत्तर नांदेडच्या पथकाची जबाबदारी मालमत्ता व्यवस्थापक राजेश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या पथकात साहेबराव जाधव, हरदीपसिंघ सुखमणी, अनिल जोशी, भिवाजी वडजे, मोतीराम गवळे, संजय गितले, आनंद कांबळे यासह मनपा पोलीस पथकातील एका कर्मचाºयाचा समावेश राहणार आहे.दक्षिण नांदेडमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी हे पथक प्रमुख राहणार आहेत. या पथकात राजेंद्र सरपाते, आयुब खान, गणपत भुरे, शेख खदीर, बाबूराव ढोले, अरुण कठाडे तसेच एका पोलीस कर्मचा-याचा समावेश राहणार आहे.या पथकांनी मंगळवारी विविध भागात भेटी दिल्या. पहिल्या दिवशी समज दिल्याचे पथकप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका