शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘भारत जोडो’साठी तिने एअर इंडियाच्या नोकरीवर सोडले पाणी! कोण आहे ही तरुणी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 07:04 IST

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून ११८ भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नाशिक रोड येथील एका तरुणीचा समावेश आहे.

नांदेड :

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून ११८ भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नाशिक रोड येथील एका तरुणीचा समावेश आहे. आतिषा पैठणकर असे तिचे नाव. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. ७ सप्टेंबरला तिचे जॉइनिंग होते. परंतु त्याच दिवशीभारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. एका हातात नोकरीचे पत्र अन् दुसऱ्या हातात भारत जोडोचे पत्र अशा द्विधा मनस्थितीत असताना, तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा  निर्णय घेतला.    

आतिषाचे कुटुंबीय मध्यमवर्गीय. घरात आई-वडील, भाऊ शिक्षण घेतोय तर मोठी बहीण वर्क फ्रॉम होम करते. आतिषाने इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग केले आहे. आतिषानेही तब्बल तीन वर्षे एअर इंडियातील नोकरीसाठी प्रयत्न केले.  एअर इंडियाने तिची मुलाखत घेतल्यानंतर ७ सप्टेंबरला तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले. तर इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्रीसाठी म्हणूनही मुलाखत दिली होती. 

६ सप्टेंबरला ती कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचली. परंतु नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत तिच्या मनात द्वंद्व सुरू होते. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही करावा लागला. परंतु एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. आईवडिलांच्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले.

नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे. त्यातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यांचे प्रश्न, अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे. - आतिषा पैठणकर  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी