शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 24, 2023 17:15 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते.

नांदेड : जुलै महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्ह्याला ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आता जिल्हा प्रशासन शासनाकडे या निधीची मागणी नोंदविणार आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिके वाहून गेली. तसेच जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली आहे. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांची आवश्यकता प्रशासनाला आहे. त्यामुळे या रकमेची मागणी लवकरच शासनाकडे केली जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे.

जिरायती शेतीसाठी सर्वाधिक निधीखरीप हंगामातील जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हे अल्पभूधारक, पाण्याची सुविधा नसणारे आहेत. याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली होती. या शेतकऱ्यांसाठी ४१७ कोटी ३३ लाख ६२ हजार ८१० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५४ लाख ३८ हजार ८०० आणि फळ पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५८ लाख ५९ हजार २२५ रुपयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरी