शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 24, 2023 17:15 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते.

नांदेड : जुलै महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्ह्याला ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आता जिल्हा प्रशासन शासनाकडे या निधीची मागणी नोंदविणार आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिके वाहून गेली. तसेच जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली आहे. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांची आवश्यकता प्रशासनाला आहे. त्यामुळे या रकमेची मागणी लवकरच शासनाकडे केली जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे.

जिरायती शेतीसाठी सर्वाधिक निधीखरीप हंगामातील जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हे अल्पभूधारक, पाण्याची सुविधा नसणारे आहेत. याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली होती. या शेतकऱ्यांसाठी ४१७ कोटी ३३ लाख ६२ हजार ८१० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५४ लाख ३८ हजार ८०० आणि फळ पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५८ लाख ५९ हजार २२५ रुपयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरी