शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 24, 2023 17:15 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते.

नांदेड : जुलै महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्ह्याला ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आता जिल्हा प्रशासन शासनाकडे या निधीची मागणी नोंदविणार आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिके वाहून गेली. तसेच जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली आहे. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांची आवश्यकता प्रशासनाला आहे. त्यामुळे या रकमेची मागणी लवकरच शासनाकडे केली जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे.

जिरायती शेतीसाठी सर्वाधिक निधीखरीप हंगामातील जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हे अल्पभूधारक, पाण्याची सुविधा नसणारे आहेत. याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली होती. या शेतकऱ्यांसाठी ४१७ कोटी ३३ लाख ६२ हजार ८१० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५४ लाख ३८ हजार ८०० आणि फळ पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५८ लाख ५९ हजार २२५ रुपयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरी