शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

विष्णूपुरी प्रकल्पात ९० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:56 IST

विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळपास २६ टक्के भरला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट साठा, इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळपास २६ टक्के भरला आहे.जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये ३५.७० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून आजघडीला जिल्ह्यात १९८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यामध्ये अप्पर मानार प्रकल्पात १९ टक्के तर लोअर मानार प्रकल्पात १० टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांतही ३५ दलघमी तर ८८ लघु प्रकल्पांत ५५ दलघमी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी १९ जुलै रोजी जिल्ह्यात केवळ १२ टक्के म्हणजे ८४ दलघमी इतका साठा होता. तुलनेत यावर्षी चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.विष्णूपुरी प्रकल्पात ९० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पाण्याचा येवा मंदावल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. मात्र कोणत्याही क्षणी जलसाठ्यात वाढ झाल्यास दरवाजे उघडावे लागतील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी गोदावरी काठच्या गावांना तसेच नांदेड शहरालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आजघडीला ४३.६७ टक्के पाऊस झाला असून सरासरी ४१४.६९ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९५५.५५ इतकी आहे. देगलूर आणि मुखेड तालुका वगळता कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. सर्वाधिक ६७.७२ टक्के पाऊस हा मुदखेड तालुक्यात तर भोकर तालुक्यात ५७.६३, नांदेड- ५३.६६, हदगाव- ५४.९८, हिमायतनगर- ९२.८३, कंधार- ५०.२३, अर्धापूर- ५०.१०, उमरी- ४६.५३, लोहा- ४९.७८, किनवट-३१.६२, माहूर-४३.७३, बिलोली- २८.५१, धर्माबाद- ३३.३८, नायगाव तालुक्यात ३५.४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी १७.४२ टक्के पाऊस देगलूर तर मुखेड तालुक्यात २५.५८ टक्के पावसाचे प्रमाण आहे. जिल्ह्यात किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर हे सर्वाधिक पावसाचे तालुके मानले जातात. पण अद्यापही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. माहूरमध्ये ४३ तर किनवट- ३१ टक्के पाऊस झाला आहे. \---इसापूर प्रकल्पाकडे डोळेजिल्ह्यातील नांदेडसह भोकर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, हदगाव, धर्माबाद, उमरी आदी तालुक्यांना इसापूर प्रकल्पातून पाणी मिळते. गतवर्षी प्रकल्प न भरल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. यंदा हे धरण भरते की नाही ? याकडे लक्ष लागले आहे. आजघडीला प्रकल्पात १२९.४२ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. हा साठा २६ टक्के इतका आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता १२७९ दलघमी आहे. त्यातील ९४८ दलघमी जलसाठा हा उपयुक्त आहे. इसापूर धरण भरल्यास निम्म्या नांदेड जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी