शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:21 IST

मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़

ठळक मुद्देमानव विकास : १७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार बसेसला प्रारंभ

भारत दाढेल ।नांदेड : मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते १७ जून रोजी या योजनेचा प्रारंभ हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा येथून करण्यात येणार आहे़यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली असून या योजनेतंर्गत ६३ आकाशी रंगाच्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे़ शालेय विद्यार्थिंनींसाठी मोफत बस वाहतूक सुविधेचा लाभ किनवट, हिमायतनगर, भोकर, बिलोली, धर्माबाद, देगलूर, उमरी, मुदखेड, लोहा या तालुक्यातील गावे, वाडी, वस्ती, तांड्यावरील विद्यार्थिंनींना मिळणार आहे़ एकुण ५३० गावातील ८ हजार विद्यार्थिंनी मानव विकासच्या बसेसने शाळेला जाणार आहेत़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांनी या बसेसचा आढावा घेवून मार्गदर्शन केले़ शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बसेस सुरू होतील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे़ याविषयी सर्व आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत़ संबंधित सर्व गटशिक्षण अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी दक्ष रहावे़ यामध्ये निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व ठरवून दिलेल्या मार्गावर नियमितपणे या आकाशी रंगाच्या बसेस धावतील़ त्यासाठी ६३ बसेसवर महिला वाहक नियुक्त करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़दरम्यान, पात्र विद्यार्थिंनींच्या याद्या संबंधित सर्व मुख्याध्यापकांनी संबंधित आगार प्रमुख यांच्याकडे सादर कराव्यात, त्यानुसार विद्यार्थिंनींचे मानव विकासचे बस पासेस तयार करून संबंधित आगार प्रमुखांनी यांच्याकडे १७ जून पर्यंत देण्याच्या व सर्व पात्र विद्यार्थिंनींना मानव विकासचे बस पासेस उपलब्ध होतील, याबाबत गटशिक्षण अधिकारी यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़यापूर्वी अनेक तालुक्यांना बस नसल्याने मुलींना गर्दीतून प्रवास करून शाळेला जावे लागत होते़ काही गावात बस नसल्याने मुलींना पायपीट करून शाळा गाठावी लागत होते़ त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींची शाळा बंद केली होती़ मात्र आता मानव विकासच्या बसेस मुळे दुर्गम भागातील मुलींना सुद्धा शहरातील शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे़ प्रशासनाने या बसेसवर महिला वाहक ठेवल्याने अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत सुरू करण्याता येणाºया ६५ बसेस मध्ये विद्यार्थिंनीशिवाय इतर प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही़ शाळेची वाहतूक करीत असताना या बसेस केवळ विद्यार्थिंनींसाठीच उपलब्ध राहतील, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिल्या आहेत़शालेय विद्यार्थीनींना असा मिळणार लाभलोहा तालुक्यातील ४८ गावातील ८९८ विद्यार्थिंनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या बसचा लाभ मिळणार आहे. तसेच देगलूर- ५६ गावातील ७४९ विद्यार्थिंनी, बिलोली- ५४ गावातील ७६३,धर्माबाद - २५ गावातील ९९२ विद्यार्थिंनी, उमरी- ६४ गावातील ८६८, मुदखेड-४८ गावातील ६५०, भोकर - ४४ गावातील ९४८, हिमायतनगर- ७६ गावातील ९०३ व किनवट तालुक्यातील १२२ गावातील ८८९ विद्यार्थिंनींना या बसेसचा लाभ मिळणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी