शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री सौर कृषीतून नांदेड जिल्ह्यात ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: October 10, 2023 17:32 IST

आजपर्यंत १२९५ एकर शासकीय जमीन संपादित

नांदेड : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यातून नांदेड जिल्ह्यातील कृषी फिडर सौरऊर्जीत करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कार्यान्वित होत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३४०१ एकरांवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातून ६८० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

ज्या गावात सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीचा मोबदला म्हणून महावितरणकडून प्रतिएकर प्रतिवर्षे ५० हजार रुपयांचे भाडे दिले जाणार आहे. त्यामध्ये दरवर्षी तीन टक्के वाढ केली जाईल. याकरिता महावितरणने लँड बँक पोर्टल सुरू केले आहे. आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात १२९५ एकर शासकीय, गायरान जमीन लीजवर घेतली आहे. यासाठी शासनाला प्रतिएकर एक रुपये याप्रमाणे नाममात्र शुल्क दिले जाते.

ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील, त्यांना शासनाकडून प्रतिवर्ष ५ लाखांप्रमाणे तीन वर्षांत १५ लाखांचा निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गतिमान करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्राचे सौरऊर्जीकरण होणार असून, त्यातून ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होईल. यासाठी जिल्ह्यात ३४०१ एकर जमिनीची गरज भासणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभा राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज मिळणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे किमान तीन एकर, तर जास्तीत जास्त ५० एकर जमीन असणे आवश्यक आहे; तसेच ही जमीन महावितरण उपकेंद्राच्या परीक्षेत्रातील ५ ते १० किमी अंतरावर जमीन करार पद्धतीने घेतली जाणार आहे.

१२९५ एकर जमीन घेतली ताब्यातमहावितरणने जिल्ह्यात ३४०१ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आजपर्यंत जिल्ह्यातील १२९५ एकर शासकीय व गायरान जमिनीचा भाडेकरार केला असून, ही जमीन ताब्यात घेतली आहे.

जमीन संपादनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाजिल्ह्यात आजपर्यंत २५० शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ शासकीय जमीन भाडेत्त्वावर नाममात्र शुल्कात घेतली असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचा अद्यापही विचार झालेला नाही. त्यामुळे जमीन संपादनाची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच आहे.

कृषी पंपांना अखंडित मिळणार वीजमुख्यमंत्री सौर कृषी योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी देण्यात येणार असून, अखंडित वीज मिळणार आहे.

जिल्ह्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्रजिल्ह्यात एकूण १५० पेक्षा अधिक उपकेंद्र असून, त्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्र आहेत. उपकेंद्राच्या १० एकर परीक्षेत्रातील जमीन करार पद्धतीने घेतली जाणार आहे. शासकीय जनीन नाममात्र दरात मिळत असल्याने खासगी जमीन घेण्यास महावितरणने अजून पुढाकर घेतलेला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण