शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर ६५० पैकी अवघे ७० हातपंप पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:58 IST

टंचाई निवारणासाठी आलेला उर्वरित निधी परत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याने पदाधिका-यांनी स्थायी समितीच्या बैठकीत एकच गदारोळ केला. विशेष म्हणजे, या बैठकीकडे प्रमुख अधिका-यांनीही पाठ फिरविल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देनिधी परत जाण्याची शक्यता : स्थायी समितीच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांची पाठ, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला संताप

नांदेड : पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यात ६५० हातपंपांना मंजुरी मिळाली होती. मात्र त्यातील अवघे ७० हातपंप घेण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे टंचाई निवारणासाठी आलेला उर्वरित निधी परत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याने पदाधिका-यांनी स्थायी समितीच्या बैठकीत एकच गदारोळ केला. विशेष म्हणजे, या बैठकीकडे प्रमुख अधिका-यांनीही पाठ फिरविल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला समाजकल्याण सभापती शीला निखाते, जि. प. सदस्य संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर, पूनम पवार, प्रवीण पाटील चिखलीकर, सुशीलाबाई बेटमोगरेकर यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती. बैठकीत बाळासाहेब रावणगावकर यांनी पाणीटंचाई उपाययोजनांचा प्रश्न उपस्थित केला. पाणीटंचाई निवारणार्थ भोकर तालुक्यात ७४ ठिकाणी हातपंप घ्यावेत, असा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला होता. मार्चमध्ये हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. प्रत्यक्षात यातील ३२ प्रस्तावांना ३१ मे रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. टंचाई उपाययोजना अंतर्गतची कामे ३० जूनपर्यंत करणे अनिवार्य असताना आता हे हातपंप घेणार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सद्य:स्थितीत काही भागात पाऊस सुरु झालेला असल्याने बोअरवेलसाठीच्या गाड्या आवश्यक त्या ठिकाणी पोहोचणे मुश्कील असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबरोबरच तायाळ पाझर तलावाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २०११ रोजी मान्यता मिळालेल्या या तलावाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या कामाबाबत तक्रारी आल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या अहवालाबाबत विचारणा केली असता उपस्थित अधिकाºयांनी सदर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे असल्याचे सांगितले. यावर प्रशासनाकडून सदर प्रकरणात लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर संबंधित प्रकरणात अधिकारी-कर्मचाºयांवर जबाबारी निश्चित करुन कारवाई करु, असा शब्द ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी दिला.कृषी विभागातील बदल्यामध्ये झालेल्या अनियमिततेचा मुद्दा जि. प. सदस्य संजय बेळगे यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. याबरोबरच २०१७-१८ मधील रकमेचा हिशेब वित्त अधिकाºयांकडे मागूनही मिळत नसल्याची त्यांनी तक्रार केली. समाजकल्याण विभागही या बैठकीत रडारवर राहिला. या विभागाच्या वैयक्तिक लाभाचे नियोजन अद्यापही झाले नाही. हे नियोजन करण्याचा शब्द मागील बैठकीत तत्कालीन समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांनी दिला होता. मात्र अद्यापपर्यंत हे नियोजन झालेले नसल्याबाबत पदाधिकाºयांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. दरम्यान, शुक्रवारच्या बैठकीत प्रशासना विरोधातील अनेक मुद्यांवर जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली होती.चार दिवसांत घरकुल योजनांची कामे सुरु करणारस्थायी समितीच्या बैठकीत ठप्प पडलेल्या घरकुल योजनेबाबतही पदाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. घरकुल योजनेसाठी ३५ हजार लाभार्थ्यांची निवडप्रक्रिया रखडली आहे.ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार आणि लाभार्थ्यांना घरकुल केव्हा मिळणार? असा संतप्त सवाल पदाधिकाºयांनी बैठकीत केला. यावर प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी सदर निवड प्रक्रिया चार दिवसांत पूर्ण करुन घरकुल योजनांची कामे मार्गी लावू, असे सांगितले. दरम्यान, या बैठकीला कृषी विभागाच्या अधिकाºयांऐवजी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या तोंडावर होत असलेल्या या बैठकीत खरीप आढावा सादर करणे आवश्यक असताना अधिकारी गैरहजर का? असा प्रश्न पदाधिका-यांनी केला.शिक्षणाधिकाºयांच्या निलंबनाची मागणीशुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर तसेच जिल्हा कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी यांचीही अनुपस्थिती होती. त्यातच शिक्षणाधिकारी दिग्रसकर बैठकीला का अनुपस्थित आहेत? असा प्रश्न पदाधिकाºयांनी केल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी दिग्रसकर हे शिक्षण विभागातील बदल्यांचे आदेश काढण्यात व्यस्त असल्याने बैठकीला येवू शकले नाहीत, असे उत्तर दिले.यावर ज्या दिवशी बदल्या झाल्या त्याच दिवशी आदेश बजावण्याचे निर्देश असताना उशिराने का कार्यवाही केली जात आहे? शासनाचे नियम केवळ पदाधिकाºयांनाच आहेत काय ? असा प्रश्र करीत सदस्यांनी दिग्रसकर यांच्या निलंबनाची मागणी केली.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई