शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देगलूर तालुक्यात खरिपाची नजरी आणेवारी ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:36 IST

तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.तालुक्यातील खरीप पिके त्यात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची महसूल प्रशासनाने सरासरी नजरी आणेवारी ३० सप्टेंबर रोजी ६० टक्के काढली आहे. मूग व उडीद पिकाची कापणी प्रयोग करुन या दोन पिकांची सरासरी आणेवारी ५० टक्क्यांच्या खाली काढण्यात आली. महसूल प्रशासनाने मूग व उडिदाच्या उत्पन्नावर वस्तुस्थितीला धरून आणेवारी काढली आहे.सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र या पिकाने शेतकºयांना कोणत्या का कारणाने होईना दरवर्षीच दगा दिला. सोयाबीनला लागणारा एकूण खर्च बघता व त्यामानाने निघत असलेले अत्यल्प उत्पादन तसेच मिळणारा कमी भाव शेतकºयांना त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढविण्यास मदत करणाराच ठरला. येत्या ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी सोयाबीनची किती काढली जाते, हेही शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी काढली जाणार असून यावरच शेतकºयांना आधार द्यायचा की त्यांना वाºयावर सोडण्याची भूमिका घेतली जाते, हे समजेल.निजामकालीन आणेवारी पद्धत बदलणार कधी ?निजामाचे राज्य असताना आणेवारी काढण्याची जी पद्धत होती तीच पद्धत आणेवारी काढताना आजही वापरली जाते. तेव्हाची शेती करण्याची पद्धत व आजच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. शेतकºयांचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. उत्पन्न व खर्च तसेच मिळणाºया भावाची सांगड घालून आणेवारी काढण्याची नवीन पद्धत शासनाने अंमलात आणणे हे शेतकºयांच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे. राज्यकर्त्यांना आणेवारी काढण्याची नवीन पद्धत अंमलात का आणावी वाटत नाही. आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी यासाठी विधानसभेत अथवा विधान परिषदेत सात्यत्यपूर्ण आवाज उठवून शासनाला आणेवारी काढण्याची पद्धत बदलण्यास भाग पाडले.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई