शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

देगलूर तालुक्यात खरिपाची नजरी आणेवारी ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:36 IST

तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.तालुक्यातील खरीप पिके त्यात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची महसूल प्रशासनाने सरासरी नजरी आणेवारी ३० सप्टेंबर रोजी ६० टक्के काढली आहे. मूग व उडीद पिकाची कापणी प्रयोग करुन या दोन पिकांची सरासरी आणेवारी ५० टक्क्यांच्या खाली काढण्यात आली. महसूल प्रशासनाने मूग व उडिदाच्या उत्पन्नावर वस्तुस्थितीला धरून आणेवारी काढली आहे.सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र या पिकाने शेतकºयांना कोणत्या का कारणाने होईना दरवर्षीच दगा दिला. सोयाबीनला लागणारा एकूण खर्च बघता व त्यामानाने निघत असलेले अत्यल्प उत्पादन तसेच मिळणारा कमी भाव शेतकºयांना त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढविण्यास मदत करणाराच ठरला. येत्या ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी सोयाबीनची किती काढली जाते, हेही शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी काढली जाणार असून यावरच शेतकºयांना आधार द्यायचा की त्यांना वाºयावर सोडण्याची भूमिका घेतली जाते, हे समजेल.निजामकालीन आणेवारी पद्धत बदलणार कधी ?निजामाचे राज्य असताना आणेवारी काढण्याची जी पद्धत होती तीच पद्धत आणेवारी काढताना आजही वापरली जाते. तेव्हाची शेती करण्याची पद्धत व आजच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. शेतकºयांचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. उत्पन्न व खर्च तसेच मिळणाºया भावाची सांगड घालून आणेवारी काढण्याची नवीन पद्धत शासनाने अंमलात आणणे हे शेतकºयांच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे. राज्यकर्त्यांना आणेवारी काढण्याची नवीन पद्धत अंमलात का आणावी वाटत नाही. आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी यासाठी विधानसभेत अथवा विधान परिषदेत सात्यत्यपूर्ण आवाज उठवून शासनाला आणेवारी काढण्याची पद्धत बदलण्यास भाग पाडले.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई