शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:54 IST

मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आजपर्यंत पेरण्या आटोपल्या. मृग नक्षत्रानंतर पावसाने दहा ते बारा दिवसांची उघडीप दिल्यानंतर पेरणी रखडली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येवून आजपर्यंत जवळपास ५४.९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देमोठ्या पावसाची अपेक्षा : सर्वाधिक ८३.७० टक्के सोयाबीनची पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आजपर्यंत पेरण्या आटोपल्या. मृग नक्षत्रानंतर पावसाने दहा ते बारा दिवसांची उघडीप दिल्यानंतर पेरणी रखडली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येवून आजपर्यंत जवळपास ५४.९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीपपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपली. यापाठोपाठ मृग नक्षत्राचा पाऊसही मुबलक प्रमाणात पडला. त्यामुळे मृगात पेरणीला सुरूवात झाली. सोयाबीन पेरणीसह कापूस आणि हळद लागवडीवर जिल्ह्यातील शेतकºयांनी भर दिला. दरम्यान, दहा ते बारा दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतक-यांची तारांबळ उडाली. नुकतेच उगवलेल्या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यातच २२ जूननंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले.मागील आठवडाभरात झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या. जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४२ हजार २६९ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.नांदेड जिल्ह्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार ४७२ हेक्टर असून त्यापैकी जवळपास साडेचार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ८३.७० टक्के सोयाबीनची पेरणी आहे तर कापसाचे ३ लाख २३ हजार ७५४ सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी २ लाख २ हजार ६५५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाºया कडधान्याची ३६ टक्के पेरणी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८९८ हेक्टर असून त्यापैकी ३२ हजार ९४७ हेक्टरवर तर मूग- सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार ९६४ हेक्टरपैकी १० हजार ६१० हेक्टर तर उडदाच्या सर्वसाधारण ५० हजार ३४२ हेक्टरपैकी १२ हजार ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.---नांदेड : हदगाव तालुक्यात सर्वाधिक पेरणीहदगाव तालुक्यात सर्वाधिक ९१.९९ टक्के तर सर्वात कमी लोहा तालुक्यात १५.३३ टक्के पेरणी झाली़ तसेच नांदेडमध्ये २९ हजार २५ हेक्टरपैकी १६ हजार १९३ हेक्टरवर, अर्धापूर - १८ हजार ४०४ पैकी १४ हजार ८०२ हेक्टरवर, मुदखेड- १७ हजार ८२१ पैकी ८ हजार ५०६, लोहा- ८६ हजार २८५ पैकी १३ हजार २२४, कंधार- ६४ हजार ५६८ पैकी ४५ हजार ३४, देगलूर- ४४ हजार ८२४ पैकी १० हजार ७३९, मुखेड- ७६ हजार ७१७ पैकी ३७ हजार ८५६, नायगाव- ४७ हजार ५३७ पैकी ७ हजार ९७०, बिलोली- ३२ हजार ७०२ पैकी २७ हजार ६०२, धर्माबाद ३० हजार ५५९ पैकी २२ हजार ८४५, किनवट- ८ हजार २३२ पैकी ५ हजार ४३७, हदगाव- ८ हजार २४५ पैकी ७ हजार ५८५ हेक्टरवर तर हिमायतनगर- ८४.५६ टक्के, भोकर- ३८.६३ टक्के, उमरी- ६४.५२ तर माहूर तालुक्यात ५२.३५ टक्के पेरणी झाली आहे.---यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारजिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर असून त्यापैकी १ लाख ६६ हजार ६३६ हेक्टर म्हणजेच ८३.७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी बिलोली तालुक्यात सर्वाधिक ४६२.५२ टक्के सोयाबीनची पेरणी झाली़बिलोलीत सर्वसाधारण क्षेत्र ३ हजार ६६ हेक्टर गृहीत धरलेले असताना १४ हजार १८१ हेक्टरवर पेरणी झाली़ तर हदगावमध्ये ४३ हजार २१३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नांदेड तालुक्यात सोयाबीनची १० हजार १११ हेक्टर, अर्धापूर- ११ हजार ५४३, मुदखेड- ४ हजार ५८६, लोहा- १ हजार १६३, कंधार- १२ हजार ४३०, देगलूर- ३ हजार ७८४, मुखेड- १६ हजार ८००, नायगाव- २ हजार १९० हेक्टर, धर्माबाद- १० हजार २५४, किनवट- ७ हजार ३६६, माहूर- ७ हजार ८६४, हिमायतनगर- १० हजार ७५०, भोकर- २ हजार ७२१ तर उमरी तालुक्यात ७ हजार ६८० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी