शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कंधार तालुक्यात नऊ दिवसांत ४ हजार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:30 IST

तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने मोठे नियोजन केले. अनेक समस्यांना सामोरे जाताना दमछाक झाली. निधीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर कामांना खीळ बसली. वरिष्ठ पातळीवरुन निधी उपलब्ध झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील निधीचा वापर (चौदावा वित्त आयोग) करण्यास मुभा देण्यात आली. १५ फेब्रुवारीपर्यंत पाणंदमुक्त तालुका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थ व अधिकारी-कर्मचारी समन्वयाने अडथळ्यावर मात करण्यासाठी सरसावले आणि त्याला यश मिळू लागले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कामे गतीने झाली.१५ ते २३ फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत ५९ गावांत ३ हजार ९६७ शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली. रेतीचे गगनाला भिडलेले भाव, पाण्याचा प्रश्न आदींवर मात करण्याचा करीत ३५ गावे पाणंदमुक्त करण्यात यश आले. त्यामुळे तालुक्यातील पाणंदमुक्त गावाची संख्या आता ९४ झाली. आता संपूर्ण ११६ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी यंत्रणा तत्परतेने कार्यरत झाली आहे.तालुक्यातील ११६ पैकी ९४ गावे पाणंदमुक्त झाली आहेत. त्यातील ९ गावे ओडीएफ झाली असून आॅनलाईन दिसत नसल्याची माहिती पंचायतच्या सूत्रांनी दिली. अशामध्ये बामणी, धानोरा (कौठा), तेलूर, दिग्रस (बु), दिग्रस (खु), नंदनवन, उमरज, वहाद आणि येलूर गावांचा समावेश आहे. अजून २२ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी मोठी धांदल सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राबविण्याचा संकल्प तडीला नेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.आता तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी अत्यल्प अवधी लागणार आहे. २२ गावांतील शिल्लक बांधकामे करण्यावर जोर दिला जात आहे. त्यात आंबुलगा १७५, औराळ १०३, बाचोटी १८९, बोरी बु. ११७, चिखली २५७, दहीकळंबा १९२, गऊळ २१० घोडज, २६५, गोणार २८६ गुंटूर २०२, कल्हाळी १६७, खंडगाव (ह) २०९, कुरुळा ५२६, मंगलसांगवी १३५, मसलगा ३१०, नागलगाव १७३, पानभोसी २७२, फुलवळ २०९, पेठवडज ८०९, शेकापूर १२३, शिराढोण ११३ आणि उस्माननगर ५७३ असे ५ हजार ६१८ शिल्लक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ ं