शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:04 IST

बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे.

ठळक मुद्देआज बाभळीचे १४ दरवाजे उघडणार त्रिसदस्यीय समितीची उपस्थिती 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. बंधाऱ्यातील उपलब्ध साठा ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर जमा असून जमा पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्याने येणाऱ्या दिवसांत या भागाला टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या सहा वर्षांत कोरडाठाक राहिलेला हा बंधारा मागील पावसाळ्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात या बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावेत व २९ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत. तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी एक मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे, असा निकाल दिला. या निकालानुसार १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या बंधाऱ्यात ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पूर्ण पाणीसाठा आता बुधवारी दरवाजे उघडल्याने तेलगंणात जाणार आहे.  

प्रकल्प सुरू करण्याची गरजगतवर्षी पावसाळा लांबला त्यातच परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्याच्या उद्घाटनानंतर सहा वर्षांत पहिल्यांदाच बंधाऱ्यात २.७४ पाणीसाठा जमा झाला. गेली सहा वर्षे बाभळी बंधारा कोरडाठाकच होता. गतवर्षी पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प चालू करावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंधाऱ्यातील पाणी नेण्यासाठी कृषीपंप अनुदान  देण्याची मागणी  होत आहे.

बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्यातबाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे. असे असताना या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंधाऱ्याला जाण्यासाठी बाभळी गावापासून ३ कि.मी. रस्ता तयार करण्यात आला असून गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका युवकाने बंधाऱ्यावरून उडी मारून आत्महत्याही केली आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणी