शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:04 IST

बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे.

ठळक मुद्देआज बाभळीचे १४ दरवाजे उघडणार त्रिसदस्यीय समितीची उपस्थिती 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. बंधाऱ्यातील उपलब्ध साठा ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर जमा असून जमा पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्याने येणाऱ्या दिवसांत या भागाला टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या सहा वर्षांत कोरडाठाक राहिलेला हा बंधारा मागील पावसाळ्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात या बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावेत व २९ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत. तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी एक मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे, असा निकाल दिला. या निकालानुसार १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या बंधाऱ्यात ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पूर्ण पाणीसाठा आता बुधवारी दरवाजे उघडल्याने तेलगंणात जाणार आहे.  

प्रकल्प सुरू करण्याची गरजगतवर्षी पावसाळा लांबला त्यातच परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्याच्या उद्घाटनानंतर सहा वर्षांत पहिल्यांदाच बंधाऱ्यात २.७४ पाणीसाठा जमा झाला. गेली सहा वर्षे बाभळी बंधारा कोरडाठाकच होता. गतवर्षी पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प चालू करावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंधाऱ्यातील पाणी नेण्यासाठी कृषीपंप अनुदान  देण्याची मागणी  होत आहे.

बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्यातबाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे. असे असताना या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंधाऱ्याला जाण्यासाठी बाभळी गावापासून ३ कि.मी. रस्ता तयार करण्यात आला असून गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका युवकाने बंधाऱ्यावरून उडी मारून आत्महत्याही केली आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणी