शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:04 IST

बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे.

ठळक मुद्देआज बाभळीचे १४ दरवाजे उघडणार त्रिसदस्यीय समितीची उपस्थिती 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. बंधाऱ्यातील उपलब्ध साठा ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर जमा असून जमा पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्याने येणाऱ्या दिवसांत या भागाला टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या सहा वर्षांत कोरडाठाक राहिलेला हा बंधारा मागील पावसाळ्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात या बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावेत व २९ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत. तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी एक मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे, असा निकाल दिला. या निकालानुसार १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या बंधाऱ्यात ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पूर्ण पाणीसाठा आता बुधवारी दरवाजे उघडल्याने तेलगंणात जाणार आहे.  

प्रकल्प सुरू करण्याची गरजगतवर्षी पावसाळा लांबला त्यातच परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्याच्या उद्घाटनानंतर सहा वर्षांत पहिल्यांदाच बंधाऱ्यात २.७४ पाणीसाठा जमा झाला. गेली सहा वर्षे बाभळी बंधारा कोरडाठाकच होता. गतवर्षी पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प चालू करावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंधाऱ्यातील पाणी नेण्यासाठी कृषीपंप अनुदान  देण्याची मागणी  होत आहे.

बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्यातबाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे. असे असताना या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंधाऱ्याला जाण्यासाठी बाभळी गावापासून ३ कि.मी. रस्ता तयार करण्यात आला असून गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका युवकाने बंधाऱ्यावरून उडी मारून आत्महत्याही केली आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणी