शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:04 IST

बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे.

ठळक मुद्देआज बाभळीचे १४ दरवाजे उघडणार त्रिसदस्यीय समितीची उपस्थिती 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. बंधाऱ्यातील उपलब्ध साठा ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर जमा असून जमा पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्याने येणाऱ्या दिवसांत या भागाला टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या सहा वर्षांत कोरडाठाक राहिलेला हा बंधारा मागील पावसाळ्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात या बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावेत व २९ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत. तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी एक मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे, असा निकाल दिला. या निकालानुसार १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या बंधाऱ्यात ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पूर्ण पाणीसाठा आता बुधवारी दरवाजे उघडल्याने तेलगंणात जाणार आहे.  

प्रकल्प सुरू करण्याची गरजगतवर्षी पावसाळा लांबला त्यातच परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्याच्या उद्घाटनानंतर सहा वर्षांत पहिल्यांदाच बंधाऱ्यात २.७४ पाणीसाठा जमा झाला. गेली सहा वर्षे बाभळी बंधारा कोरडाठाकच होता. गतवर्षी पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प चालू करावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंधाऱ्यातील पाणी नेण्यासाठी कृषीपंप अनुदान  देण्याची मागणी  होत आहे.

बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्यातबाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे. असे असताना या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंधाऱ्याला जाण्यासाठी बाभळी गावापासून ३ कि.मी. रस्ता तयार करण्यात आला असून गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका युवकाने बंधाऱ्यावरून उडी मारून आत्महत्याही केली आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणी