शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

जलसाठा@२५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:39 IST

जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांची स्थिती : पाणीटंचाईच्या झळा

नांदेड : जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत १७३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामध्ये जिल्ह्यात असलेल्या २ मोठ्या प्रकल्पांपैकी मानार प्रकल्पात ३८.४५ म्हणजेच २७.८२ टक्के आणि विष्णूपुरी प्रकल्पात ३६.०९ म्हणजे ४४.६७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांचीही स्थिती बिकटच असून नऊ प्रकल्पांत २६.०६ दलघमी इतका जलसाठा आहे. ही टक्केवारी १८.७४ इतकी आहे. जिल्ह्यात ३ उच्चपातळी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता २१७.१२ दलघमी इतकी असताना आजघडीला केवळ २७.३९ दलघमी जलसाठा आहे. ८८ लघुप्रकल्पांतही २३.३२ टक्के म्हणजे ४५.०७ दलघमी इतका जलसाठा आहे. जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे चार असले तरीही या बंधाºयांत एक थेंबही पाणी अडविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १४६ प्रकल्प आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्प २७.७४ दलघमी म्हणजेच २.९३ टक्के साठा आहे. येलदरी प्रकल्प कोरडाठाक पडला असून सिद्धेश्वर प्रकल्पात २१.९१ टक्के जलसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत केवळ ११.०६ दलघमी म्हणजेच, १०.४६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातून जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांना पाणी उपलब्ध होते. या प्रकल्पात ३८.१२ टक्के म्हणजेच ३६७.५६ दलघमी पाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पातून जिल्ह्याला सध्या पाणीपाळी सुरू आहेत.नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत जलसाठ्याची उपरोक्त स्थिती आहे. मागील वर्षी याचवेळी नांदेड जिल्ह्यात २८.४८ टक्के म्हणजेच, १९२.९६ दलघमी जलसाठा शिल्लक होता. हिंगोली जिल्ह्यात ६९.८३ दलघमी अर्थात ७.३७ टक्के जलसाठा होता. इसापूर प्रकल्पात केवळ ४.८४ टक्के म्हणजेच ४६.६३ दलघमी जलसाठा शिल्लक होता.यावर्षी इसापूर प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाल्याने नांदेड जिल्ह्याला सिंचनासह पिण्यासाठीही इसापूर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. गतवर्षी पाणी न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, उमरी आदी भागांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे या भागातील रबी हंगाम कोरडा गेला होता. यावर्षी मात्र सदर भागात रबी हंगामातील पिके बहरली आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.महापालिकेची पाण्यासाठी धावपळ सुरूविष्णूपुरी प्रकल्पातून दरमहा ९ ते १२ दलघमी पाणीउपसा सुरू आहे. याच वेगाने पाणीउपसा सुरू राहिल्यास एप्रिलअखेरच प्रकल्प कोरडा होणार असून त्यानंतर मे, जून, जुलै हे तीन महिने कसे काढायचे? याची चिंता केली जात आहे. महापालिकेने आतापासूनच शहरात टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील हातपंप तसेच विद्युत बोअर दुरुस्तीचेही आदेश महापालिकेने दिले आहेत. दुसरीकडे इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी दुसरी पाळी घेण्याचेही प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई