शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

१४० गावांनाच भेटी देवून जिंकली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:32 IST

राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी जनता दलाचे डॉ़ व्यंकटेश काब्दे विजयी झाले़ केवळ सहा लाख रूपये खर्च करून आणि बाराशे पैकी १४० गावांनाच भेटी देवून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी ही निवडणूक जिंकली़

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक १९८९ डॉ़ व्यंकटेश काब्दे यांचा २४ हजार मतांनी विजय

भारत दाढेल।नांदेड : राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी जनता दलाचे डॉ़ व्यंकटेश काब्दे विजयी झाले़ केवळ सहा लाख रूपये खर्च करून आणि बाराशे पैकी १४० गावांनाच भेटी देवून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी ही निवडणूक जिंकली़१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा केलेला पराभव त्यावेळी राज्यात चांगलाच गाजला होता़ या निवडणुकीच्या आठवणी सांगताना डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, १९८७ मध्ये नांदेड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी विजय संपादन केला होता़ मात्र १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माझ्या सारख्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला़ अमेरिकेतून त्यावेळी मी नुकताच नांदेडला आलो होतो़ घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता़ आणि राजकारणाचाही मला गंध नव्हता़ मात्र सामान्य नागरिकाने राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे़ मी तर डॉक्टर होतो़ असा विचार माझ्या मनात आला़ ही गोष्ट माझ्या पत्नीला सांगितली़ तीने होकार दिला़ मात्र माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी या गोष्टीला विरोध केला़ विद्यमान खासदार अशोक चव्हाण समोर असताना त्यांना पराभूत करणे हे सोपे नाही, असा सल्ला त्यांनी दिला़ मात्र माझा निर्णय कायम होता़ त्यावेळी व्ही़ पी़ सिंग यांचे नाव देशभर चर्चेत आले होते़ त्यामुळे मी जनता दलाकडून इच्छुक होतो़ त्यासाठी माझ्या घरी एक बैठक घेतली़ भोजालाल गवळी यांनी मला प्रोत्साहन दिले़ उमेदवार निवडीसाठी जनता दल पक्षाने एक समिती स्थापन केली होती़ त्यामध्ये गंगाधर पटने होते़ ते सुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेत होते़ त्यांचे आणि माझे नाव अखेर पर्यंत चर्चेत होते़ उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती़ मात्र माझे नाव फायनल होते़ पत्नीने बचत केलेले दोन लाख रूपये, मित्रांनी मदत म्हणून दिलेले दोन लाख रूपये आणि २ रूपययांचे कर्ज काढून मी लढलो़ प्रचाराची यंत्रणा तोकडीच होती़ वाहने मोजकेच होते़ त्यामुळे कार्यकर्ते जमेल तसे स्वत:च खर्च करून माझा प्रचार करू लागले़नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात निवडणूक लागल्याने थंडीचे दिवस होते़ कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत माझा प्रचार करायचे़ रात्री उशीरा येवून माझ्या घराच्या अंगणात झोपी जायचे़ त्यावेळी १ हजार २०० गावे मतदार संघात होते़ मात्र मी १४० गावातच पोहचू शकलो़ माझे निवडणूक चिन्ह चक्र होते़लोकांनी लिंबाच्या पाल्याने आपल्या घराच्या भिंतीवर चक्र ही निशानी काढली होती़ लोकांचे हे प्रेम पाहून मी भारावलो होतो़ त्यामुळे या निवडणूकीत मी नव्हे तर लोक उभे होते़ ही निवडणूक सर्वसामान्य लोकांची होती़प्रचार काळात बापुसाहेब काळदाते, भाई वैद्य, सदाशिवराव पाटील, गुरूनाथ कुरूडे आदींनी सभा घेवून माझा प्रचार केला़ तर १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान व्ही़ पी़ सिंग, माजी पतंप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी पंतप्रधान दैवेगोडा या तिघांनी सभा घेतल्या होत्या़निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकली निवडणूक१९८९ ची लोकसभा निवडणुकीत राजकारणाची कोरी पाटी असलेल्या डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी काँगेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला़ डॉ़ व्यंकटेश काब्दे यांना २ लाख ७८ हजार ३२० तर अशोक चव्हाण यांना २ लाख ५४ हजार २०७ मते मिळाली़ २४ हजार ११३ मतांनी ही निवडणूक डॉ़ काब्दे यांनी जिंकली़ विशेष म्हणजे डॉ़ काब्दे यांना नांदेड शहरातून सर्वाधिक मते मिळाली होती़ साधनांची कमतरता असतानाही निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक डॉ़ काब्दे यांनी जिंकली होती़ वैद्यकीय क्षेत्रासोबतच डॉ़ काब्दे यांनी राजकारणातही यश मिळविले़प्रचारासाठी जात असताना झाला होता अपघातनांदेड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मी आणि माझे सहकारी पहाटेच जीपने अहमदपूरकडे निघालो़ लोह्याच्या पुढे एका वळणावर आमच्या जीपला अपघात झाला़ जीप पूर्ण पलटी झाली होती़ जीप मध्ये बसलेला आम्ही चार, पाच जन कसे बसे बचावलो़ सगळ्यांना मार लागला़ मात्र त्याही अवस्थेत आम्ही पुन्हा दुसऱ्या वाहनाने अहमदपूरकडे निघालो़ अपघाताची वार्ता सर्वदूर गेली़ काहींनी तर या अपघातातून आम्ही वाचलो याचा अर्थ आम्ही विजयी होणार, असाही लावल्याचे डॉ़ काब्दे यांनी सांगितले़

टॅग्स :nanded-pcनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक