शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

हदगाव तालुक्यात १४० डीपी नादुरुस्त,८० जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:16 IST

तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़

ठळक मुद्देमागणी करुनही पाच वर्षांपासून डीपी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़तालुक्यात (१२) ३३ केव्ही विद्युत केंद्र आहेत़ तळणी, हदगाव, ल्याहरी, तामसा, मनाठा, बरडशेवाळा, निवघा, कोळी, लोहा-डिग्रस व घोगरी, आष्टी या ठिकाणी ही केंद्रे आहेत़ घरगुती व कृषीपंपाचे एकूण ३३ हजार ग्राहक आहेत़ हदगाव शहर ५ हजार ९००, ग्रामीण ४ हजार ५००, तळणी ३ हजार, आष्टी ३ हजार ५००, मनाठा ३ हजार ५००, तामसा ४ हजार, निवघा ४ हजार अशी ही संख्या आहे़तळणी-निवघा या बाजुला थ्रीफ्रेज विद्युत मिळतो़ लोडशेडींग सोडून तर तामसा, मनाठा, हदगाव शहर सिंगल फेज विद्युत भारनियमन सोडून मिळतो़ परंतु मागील पावसात, वादळामुळे सिंगल फेज व थ्री फेज मिळून १४० रोहीत्र नादुरुस्त झाले आहेत़८० रोहीत्र जळाले़ आता याची दुरुस्ती करून देणयाची जबाबदारी रोहीत्र पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असते़ दोन वर्षाची गॅरंटी असते व या एजन्सी आपली कर्तव्य बजावतात़ परंतु या दुरुस्तीसाठी विद्युत केंद्रांनी त्यांना आॅईल पुरविणे बंधनकारक असते़ परंतु भोकर डिव्हीजनला आॅईलच उपलब्ध नसल्याने रोहीत्राची नादुरुस्ती रखडली व या संख्येतही वाढ झाली़ याबाबत तताडीने कार्यवाहीची मागणी होत आहे़

  • नवीन डीपीसाठी शेतकरी वर्गणी जमा करून कोटेशन भरतात़रोहीत्र मिळत नाही़ कधी तीन वर्ष तर कधी पाच वर्षाचा कालावधी लागतो़ तोपर्यंत शेतकरी थांबत नाहीत़ उपलब्ध डीपीवरच जोडणी घेतली जाते़ त्यामुळे भार वाढून रोहीत्र जळते. वाढीव तापमान हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले.

आष्टीकरांचे बावनकुळे यांना साकडेरोहीत्र जळाल्याने ताबडतोब मिळत नाही़ मागणीच्या तारखेपासून डीपी मिळतो़ आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने विजेचा भार वाढला़ त्यामुळे पूर्वीचे नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करून मिळावे म्हणून विभागावर दबाव येत आहे़लोकप्रतिनिधी यासाठी वरिष्ठ अधिका-यांना धारेवर धरत आहेत़ आ़नागेश पाटील यांनी वीज समस्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली़ मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी संवाद साधला़

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज