शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यात १४० डीपी नादुरुस्त,८० जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:16 IST

तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़

ठळक मुद्देमागणी करुनही पाच वर्षांपासून डीपी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़तालुक्यात (१२) ३३ केव्ही विद्युत केंद्र आहेत़ तळणी, हदगाव, ल्याहरी, तामसा, मनाठा, बरडशेवाळा, निवघा, कोळी, लोहा-डिग्रस व घोगरी, आष्टी या ठिकाणी ही केंद्रे आहेत़ घरगुती व कृषीपंपाचे एकूण ३३ हजार ग्राहक आहेत़ हदगाव शहर ५ हजार ९००, ग्रामीण ४ हजार ५००, तळणी ३ हजार, आष्टी ३ हजार ५००, मनाठा ३ हजार ५००, तामसा ४ हजार, निवघा ४ हजार अशी ही संख्या आहे़तळणी-निवघा या बाजुला थ्रीफ्रेज विद्युत मिळतो़ लोडशेडींग सोडून तर तामसा, मनाठा, हदगाव शहर सिंगल फेज विद्युत भारनियमन सोडून मिळतो़ परंतु मागील पावसात, वादळामुळे सिंगल फेज व थ्री फेज मिळून १४० रोहीत्र नादुरुस्त झाले आहेत़८० रोहीत्र जळाले़ आता याची दुरुस्ती करून देणयाची जबाबदारी रोहीत्र पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असते़ दोन वर्षाची गॅरंटी असते व या एजन्सी आपली कर्तव्य बजावतात़ परंतु या दुरुस्तीसाठी विद्युत केंद्रांनी त्यांना आॅईल पुरविणे बंधनकारक असते़ परंतु भोकर डिव्हीजनला आॅईलच उपलब्ध नसल्याने रोहीत्राची नादुरुस्ती रखडली व या संख्येतही वाढ झाली़ याबाबत तताडीने कार्यवाहीची मागणी होत आहे़

  • नवीन डीपीसाठी शेतकरी वर्गणी जमा करून कोटेशन भरतात़रोहीत्र मिळत नाही़ कधी तीन वर्ष तर कधी पाच वर्षाचा कालावधी लागतो़ तोपर्यंत शेतकरी थांबत नाहीत़ उपलब्ध डीपीवरच जोडणी घेतली जाते़ त्यामुळे भार वाढून रोहीत्र जळते. वाढीव तापमान हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले.

आष्टीकरांचे बावनकुळे यांना साकडेरोहीत्र जळाल्याने ताबडतोब मिळत नाही़ मागणीच्या तारखेपासून डीपी मिळतो़ आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने विजेचा भार वाढला़ त्यामुळे पूर्वीचे नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करून मिळावे म्हणून विभागावर दबाव येत आहे़लोकप्रतिनिधी यासाठी वरिष्ठ अधिका-यांना धारेवर धरत आहेत़ आ़नागेश पाटील यांनी वीज समस्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली़ मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी संवाद साधला़

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज