शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेड जिल्ह्यात तेरा दिवसांत १०० कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:21 IST

चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़

ठळक मुद्दे‘लोकमत’ चा पाठपुरावा : मंडळस्तरावरील नियोजनामुळे वाटपाला गती

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयानुसार वेळापत्रक जाहीर करुन कार्यवाही केल्यानंतर कर्जवाटपाला गती मिळाली आहे़ मागील तेरा दिवसांत जिल्ह्यतील २८ बँकांनी सुमारे १०० कोटींचे कर्ज वाटप केले आहे़दमदार पावसानंतर जिल्हाभरात खरीप पेरण्यांची लगबग सुरु झाली़ मात्र त्यानंतरही पीककर्ज वाटपाला अपेक्षित गती मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती़ एकट्या जिल्हा बँकेला खरिपासाठी १५२ कोटी ८२ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे़ उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील ७ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र संरक्षणाखाली येणार आहे़ मात्र १३ जूनपर्यंत जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील १४ हजार ३६२ शेतक-यांना अवघे ३२ कोटी ५४ लाख म्हणजेच उद्दिष्टाच्या २१ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते़ इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्ज वाटपाची आकडेवारी तर आणखीनच निराशाजनक होती़जिल्ह्यातील १५ बँकांनी १०० पेक्षाही कमी शेतक-यांना कर्ज वाटप केले होते़ त्यामुळेच खरिपासाठी जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ २८ टक्के कर्ज वाटप झाले होते़ या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवार, १५ जून रोजी तातडीने बँकर्स कमिटीची बैठक घेतली़ या बैठकीत जिल्ह्यातील कर्ज वाटपाचा सविस्तर आढावा घेण्यात आला़ याबरोबरच या प्रक्रियेला गती देण्यासाठी मंडळस्तरावर मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यासाठीचे तालुकानिहाय वेळापत्रकही जिल्हाधिका-यांनी जाहीर केले़ ज्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आहेत़ त्याबरोबरच मागणी करुनही कर्ज उपलब्ध होत नाही, अशा शेतक-यांनी तालुका उपनिबंधक यांच्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले़ याबरोबरच माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण यांनीही प्रशासनाशी संवाद साधला़ खरीप हंगामासाठी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पीककर्ज वाटपासह कर्जमाफी आणि बोंड अळीच्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना तातडीने अदा करण्याचे निर्देश दिले़ या घडामोडीनंतर पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यात गती मिळाली़ मागील अवघ्या १३ दिवसांत जिल्ह्यातील २८ बँकांनी सुमारे १०० कोटींचे पीककर्ज वाटप केल्याने २९ हजार १३८ शेतक-यांना दिलासा मिळाला आहे़ मात्र कर्ज वाटपाची गती आणखी वाढविण्याची गरज आहे़---बँकांसमोर रांगापीककर्ज वाटप मंडळस्तरावर करण्याचे प्रशासनाने निश्चित केले़ त्यानुसार वेळापत्रक तयार करुन वाटपाची कार्यवाही सुरु केल्याने या एकूणच प्रक्रियेला गती आली़ सद्य:स्थितीत जिल्हा- भरातील बँकांसमोर शेतक-यांच्या रांगा लागल्याचे चित्र असून, येणाºया दिवसांत पीककर्ज वाटपाच्या या प्रक्रियेला आणखी गती द्यावी लागणार आहे़---आणखी गती देणारखरीप हंगामासाठी शेतक-यांना वेळेत कर्ज पुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे़ या अनुषंगाने तीन बँकांना नोटीस बजावली़ शिवाय बैठका घेवून पाठपुरावा सुरु आहे़ मंडळस्तरावर केलेल्या नियोजनाचेही सकारात्मक परिणाम दिसत आहेत़ शंभर टक्के कर्ज वाटपासाठी आग्रही असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीbankबँकNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड