शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:25 AM

येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

ठळक मुद्देगावात भीतीचे वातावरण आरोग्य विभागासमोर मोठे आव्हानआरोग्याधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

सगरोळी : येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.बोळेगाव हे दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव. येथील गावातील सर्वच नागरिकांना मांजरा नदीचे, बोअरवेलचे पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. पाणीपुरवठाही सुरळीत होतो. मात्र गत अनेक वर्षांपासून पाणीनमुने तपासण्या करण्याकडे ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तेलंगणा रॉयल सीमेवरचे गाव असल्याने अनेक नागरिक शिंदी, दारू, विडी, सिगारेट व गुटख्याच्या व्यसनात ओढले गेले आहेत.या गावापासून तीन कि.मी.अंतरावर सगरोळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर १२ कि.मी.वर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बिलोली ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय आहे. गावात दोन अंगणवाड्या असून गरोदर माता, कुपोषित माता व बालके, किशोरवयीन मुलींची तपासणी व आहारविषयी सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्या तरी यांना कॅन्सर- सारख्या जीवघेण्या रोगाचे रूग्ण आढळले नाहीत. याबाबत या भागात आश्चर्य व्यक्त होत आहे. मांजरा नदीकिनाºयावर वसलेल्या सगरोळी परिसरासह बोळेगावात बºयाच प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे येथील जमीन ओलिताखाली असून या भागात रबी व खरीप हंगामातील पिके व भात (साळ) पिकाबरोबरच भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.फूलकोबी, पानकोबी, गड्डाकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, दोडके, भेंडी यासह विविध फळभाज्या तसेच पालेभाज्या, बिलोली, सगरोळी, बोधन, नायगाव, कुंडलवाडी, कासराळी, देगलूर आदी आठवडी बाजारात विकल्या जातात. कमी काळात जादा उत्पादन घेण्याबरोबरच कीड लागू नये म्हणून, या भाज्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारले जातात. त्याचा फटका मात्र नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. त्यासाठी या भागातील माती व पाण्यात नेमके कोणते विषारी घटक आहेत. त्याचे प्रमाण किती आहे? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? कोणते कीटकनाशके घातक आहेत हे तपासणे गरजेचे आहे. यावर काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. बोळेगावातील कॅन्सरचे रुग्ण सध्या बार्शी तर काही मुंबई येथील कॅन्सरसाठी प्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.अलीकडेच मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.असं काही होईल असे वाटलेच नव्हते. सतत जाणवणाºया त्रासामुळे काही चाचण्या बार्शी येथील दवाखान्यात करवून घेतल्या आणि त्यातून कॅन्सरचे दुखणे समोर आले. माझी पत्नी, माझ्या मुलींनी धीर दिला. माझ्या कुटुंबियाच्या प्रेमावर मी कॅन्सरशी लढा देणार आहे - राम शिरगिरे बोळेगाव (बार्शी रूग्णालयात उपचार चालू असलेले रूग्ण.)लवकरात लवकर उपचार सुरू करणे हा एकमेव उपाय आहे आणि आम्ही तेच केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी सध्या मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आम्ही आशावादी आहोत. कॅन्सरविरूद्ध लढा देण्याचा निर्धार केला. या काळात माझे पती मोलमजुरी करून माझ्या आजारावरील उपचाराचा खर्च करीत आहेत -राधाबाई शिवाजी कोंडापल्ले बोळेगाव (टाटा मेमोरियल मुंबई येथे उपचार घेत असलेले रूग्ण.)चार ते पाच महिन्यांपूर्वी सगरोळी येथे एक कॅम्प झाला होता. त्या कॅम्पमध्ये कॅन्सरचे रूग्ण आढळून आले नाहीत. कदाचित कॅन्सर रूग्ण दुसºया ठिकाणी उपचार करीत असतील त्यामुळे असे कॅम्पमध्ये दाखल झाले नाहीत. त्यामुळे या भागात कॅन्सर रूग्ण आहेत किंवा नाहीत हे निश्चित सांगणे कठीण आहे -डॉ. वाडेकर, आरोग्य अधिकारी बिलोली

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यcancerकर्करोग