शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

१ कोटींना गंडवून वाळू ठेकेदार पसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:35 IST

शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील सगरोळीचा प्रकार रिकामे २०० ते २५० ट्रक शेतात उभेठेकेदार म्हणाले, पैसे देणार

सगरोळी : शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.गावच्या सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली आहे. याशिवाय या घाटावरील २०० ते २५० ट्रक एका शेतात उभे आहेत. र्पाकिंगसाठीही पैसे देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने पैसे मिळाल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका सदर शेतकऱ्यांने घेतली आहे.सगरोळी येथील गट क्रमांक ३०५, ३०६, ३०८, ३०९, ३३४, ३३५, ३४९ मध्ये वाळू घाट आहेत. यातील एका घाटाचा लिलाव झाला. हा घाट नांदेड येथील एका ठेकेदाराने मित्रांच्या भागीदारीने घेतला.जवळपास दीड महिन्याच्या उपशानंतर ठेकेदाराची बक्कळ कमाई झाली. याच दरम्यान देगलूर येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बनावट पावत्यांच्या संशयावरुन २८ ट्रक पकडून लाखो रुपये दंडा आकारला. याशिवाय बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी पहिल्याच दिवशी दोन ट्रकवर दंडात्मक तर तहसीलच्या फिरत्या पथकाने दोन दिवसात सहा ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची एकूण रक्कम ५० ते ६० लाखांच्या घरात जाते.ही रक्कम भरल्याशिवाय ट्रक पुन्हा मिळणार नाहीत, ट्रकमालकही पैसे सोडणार नाही, या भीतीने घाईघाईने ठेकेदाराने रात्रेंदिवस मजुरारवी व जेसीबीद्वारे उत्खनन करीत २०० ते २५० ट्रक वाळूने भरले. आठवडाभरात दोन ते अडीच हजार ट्रक भरले. एका ट्रकला सात ते साडेसात हजार रुपये भरवई ठेकेदार देत असे. याप्रमाणे १५ दिवसाचे ४० ते ५० लाखापेक्षा जास्त गावक-याचे देणे झाले. मजुरांनी व सरपंचांनी दररोज विचारण करु लागले, तेव्हा एक ते दोन दिवसात पैसे देतो, असे सांगून ठेकेदार वेळ मारुन नेई.एकीकडे प्रशासनाच्या दंडाची रक्कम ५० ते ६० लाख रुपये व मजुरी ४० ते ५० लाख असे एकूण १ कोटींचे देणे झाले होते. एक कोटींचे गंडांत्तर टाळण्यासाठी ठेकेदाराने शक्कल लढविली आणि त्याने ३० मे रात्री साहित्यासह धूम ठोकली.दरम्यान, सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली.सरपंच,उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मध्यस्थीने थांबलेले मजुर आता मजुरीसाठी सरपंच व संबंधितांना वेठीस धरत आहेत. आता सर्व गावकरी मिळून ठेकेदाराचा शोध घेत आहेत.दरम्यान, २०० ते २५० रिकामे ट्रक रमेश मोतीवार यांच्या शेतात उभे आहेत. पार्किगपोटी काही रक्कम देण्याचे आश्वासन ठेकेदाराने मोतीवार यांनाही दिले होते, मात्र खडकूही न मिळाल्याने पैसे दिल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका मोतीवार यांनी घेतली.

सरपंच, तलाठी, ठेकेदार म्हणालेरेती घाट सुरू झाल्यापासून दर आठवड्याला मजुरांची भरवई मजुरी देण्याचे सर्व गावक-यांच्या समक्ष ठरविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे एक दोन आठवड्याचे पैसे ठेकेदाराने दिले. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून चालढकल करून शेवटी चाळीस ते पन्नास लाख रुपये ठकवून फरार झाला असून गावक-यांच्या नाराजीचा सामना आम्हाला करावे लागत आहे- व्यंकटराव सिदनोड, सरपंच प्रतिनिधी सगरोळी

सगरोळी रेतीघाट ठेकेदारास शासनस्तरावरून तात्पुरते बंद किंवा पूर्णपणे बंद असे कोणतेही नोटीस देण्यात आलेले नाही. दररोज सुरळीत चालू असणारे घाट असे अचानक का आणि कशासाठी ठेकेदार घाट बंद केला आहे. हे त्यांनाच माहित़-खांडेकर, तलाठी, सज्जा सगरोळी

आम्ही रेती घाट बंद केला नाही. आमचे कांही टेक्नीकल अडचणी आहेत. शिवाय सोबतचे सहकारीही स्वत:च्या कामात व्यस्त आहेत. घाटावर देखरेखीसाठी कुणीही नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस घाट बंद ठेवण्यात आला आहे. गावचे पैसे देणे आहे. घाट चालू करताच संपूर्ण पैसे देण्यात येथील गंडवण्याचा येथे प्रश्नच येत नाही़-सूर्यकांत पवार, सगरोळी रेती घाट ठेकेदाऱ

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूgodavariगोदावरी