शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

जि. प. निवडणुकीचे काम उधारीवर : प्रशासनाला हवे ६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:49 PM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआयोगाकडून एक रुपयाही निधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. एका मतदारामागे ४० रुपये प्रमाणे ६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निधी प्राप्त झालेला नसला तरीसुद्धा जिल्हा प्रशासन आपल्या स्तरावर सगळी तयारी करीत आहे. जिल्ह्यात एकूण १८२८ केंद्रांवर मतदान होणार आहे. १३ तालुक्यांसाठी तहसीलदार संवर्गातील १३ अधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ५८ सर्कलसाठी एकूण २२५ झोन तयार करण्यात आले आहेत. मतदानासाठी २०१२ कंट्रोल तर ४०२४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. मशीन बंद पडल्यास दहा टक्के मशीनसाठा अतिरिक्त देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ५८ व पंचायत समितीच्या ११६ जागेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४२ अर्ज अवैध ठरले आहे. यात जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या २६ अर्जाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ४२५ उमेदवार तर पंचायत समितीसाठी ६७० उमेदवार वैध आहे. ३० डिसेंबर रोजी ११ ते ३ या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.अपील करण्याची आज शेवटची तारीखजिल्हा परिषदच्या ५८ जागांसाठी ४४१ अर्ज प्राप्त झाले असून यातील ७२ अर्ज अवैध ठरविण्यात आली आहेत. काही अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अर्ज अवैध ठरवल्यास जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची तरतूद असून शुक्रवार अपील करण्याची शेवटची मुदत आहे.

 

 

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकfundsनिधी