शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक हिवाळी अधिवेशनानंतरच    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:53 IST

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्यानिवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे.नागपूरसह धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून ११ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आयोगाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादीच ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाला नव्याने यादी करण्याची गरज नाही. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. त्याचा निकाल येत्या ७ तारखेला लागणार आहे. न्यायालय काय निकाल देते त्याकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निकाल दिला तरी. एकूणच निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भात विचार केला तरी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता नाही. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता नाही. तेव्हा हिवाळी अधिवेशन संपल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगितले जात आहे. सव्वा दोन ते अडीच वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर राज्य शासनाने नागपूर जिल्हा परिषदेतील दोन ग्रामपंचायतींचा दर्जा वाढवला. त्यामुळे या ग्रामपंचायती वगळाव्या लागल्याने निवडणुका घेता आल्या नाही. शासनाने जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. दुसऱ्या कार्यक्रमाच्या वेळीही एका ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावण्यात आला. त्याच प्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. राज्य शासनाने आरक्षणाबाबत कोणातही निर्णय घेतला नाही. यामुळे वाशिम, अकोला, नंदूरबार, धुळे जिल्हा परिषदांनाही मुदतवाढ मिळाली. दरम्यान आयोगाने पुन्हा कार्यक्रम जाहीर केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालच्या भीतीने सर्व जिल्हा परिषदा बरखास्त करून प्रशासकाची नियक्ती करण्यात आली. अशाप्रकारे सर्व जिल्हा परिषदांना जवळपास सव्वा दोन ते अडीच वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक