शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

जि.प. अध्यक्षांना फटाके, उपाध्यक्षांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:25 AM

मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले.

ठळक मुद्देसभापतींची फिप्टी-फिप्टी : माजी उपाध्यक्षांसाठी फिलगुड निकाल; जि.प. निकालाचे समीकरण बिघडणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले. मात्र उपाध्यक्षाने आपल्या दत्तक गावातल्या ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता मोडीत काढून ताबा मिळविला. जि.प. मधील चार सभापतींपैकी दोघांना आपल्या ग्रामपंचायती राखण्यात यश आले तर दोघे अपयशी ठरले.ग्रामपंचायतीच्या निकालावर जिल्हा परिषद व विधानसभेच्या निवडणुकीचा कौल ठरतो. जि.प.च्या सदस्यच आपल्या सर्कलमधील ग्रामपंचायतीचे उमेदवार उभे करतात. त्यांच्या प्रचारापासूनची जबाबदारी घेतात. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात आल्यास, जि.प.च्या निवडणुकीच्या दृष्टीने चांगले संकेत असतात. न्यायालयीन प्रकरणामुळे जि.प.च्या निवडणुका काहीशा लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आज ना उद्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पदाधिकारी व एकंदरीतच जि.प. सदस्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायतीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांच्या जाऊ ज्योती सावरकर ह्या सरपंच पदासाठी धानला ग्रा.पं.मधून उभ्या होत्या. त्यांना शिवसेनेचे तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे तापेश्वर वैद्य व अध्यक्षांचे पती टेकचंद सावरकर हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहे. अध्यक्षांनी ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. गावाच्या विकासासाठी जि.प.चा सर्वाधिक निधी वळविला होता. तरीसुद्धा शिवसेनेने या ग्रामपंचायतीत संपूर्ण पॅनेल निवडून आणले आहे. दुसरीकडे जि.प. चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचे दत्तक गाव असलेल्या जुनी कामठी (गाडेघाट) या गावात काँग्रेसची सत्ता मोडीत काढून नऊपैकी सहा सदस्य व सरपंच निवडून आणले.गेडाम, चव्हाण अपयशी!शिक्षण व अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांचे मूळगाव व त्यांचा जि.प. सर्कल असलेल्या बेलोना ग्राम पंचायतीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. येथे सरपंचासह सदस्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजयश्री पटकावली. तर समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या भानेगाव व चिचोली ग्रामपंचायतमध्ये त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांच्या मकरधोकडा ग्राम पंचायतीमध्ये त्यांना सरपंच पदाचा उमेदवारासह पाच सदस्य निवडून आणण्यात यश आले आहे. कृषी सभापती आशा गायकवाड यांना त्यांच्या सर्कलमधील मनसर ग्रामपंचायत राखण्यात यश आले.चिखले सरपंच पण पॅनल गेलेजि.प.चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रशेखर चिखले यांचे मूळगाव असलेल्या मेंढेपठार (बाजार) येथे गेल्या ६५ वर्षापासून चिखले गटाचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा या गटाला युवा पॅनलच्या गटाने चांगलाच हादरा दिला आहे. मात्र, सरपंच म्हणून चिखलेंच्या पत्नी दुर्गा चंद्रशेखर चिखले यांनाच गावकºयांनी आपली पसंती दर्शविली. त्यांची या निवडणुकीत गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती झाली.दोन्ही जि.प. सदस्यांचा पराभवजिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्या सरिता रंगारी व कुंदा आमधरे यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले होते. जि.प. सदस्यपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता त्यांना सरपंच व्हायचे होते. काँग्रेसच्या सरिता रंगारी या कोराडी सर्कलचे तर काँग्रेसच्या कुंदा देवराव आमधरे या आजनी सर्कलचे नेतृत्त्व करतात. सरीता रंगारी या येरखेडा ग्रा. पं. मध्ये तर आमधरे या रनाळा ग्रा. पं. च्या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभ्या होत्या. विशेष म्हणजे सरिता रंगारी या काँग्रेसशी बंडखोरी करीत रिंगणात उतरल्या होत्या. परंतु त्यांना काँग्रेसच्याच विद्यमान सरपंच मंगला कारेमोरे यांनी पराभूत केले. तर कुंदा आमधरे यांना भाजपाच्या सुवर्णा साबळे यांनी मात दिली. जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुमारे १४ ते १५ ग्रामपंचायती असतात. एवढ्या गावांमधून जिल्हा परिषदेवर पोहचल्यानंतरही एका गावापुरत्या मर्यादित असलेल्या या निवडणुकीत दोन्ही सदस्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.तीन गावात सरपंचच नाहीनागपूर ग्रामीण तालुक्यातील खंडाळा आणि ब्राह्मणवाडा तसेच उमरेड तालुक्यातील आपतूर येथे सरपंचपदासाठी एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. या जागांवर निवडणूक लढण्यासाठी राखीव प्रवर्गातील एकाही उमेदवारने अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे येथील सरपंचाची पदे रिक्त राहिली आहेत.‘वडविहिरा’ गावात अनिल देशमुखांना धक्कामाजी मंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या ‘वडविहिरा’ या गावात धक्का बसला. माजी मंत्री रणजित देशमुख, व विद्यमान आ. डॉ. आशिष देशमुख गटाच्या उमेदवारांनी तेथे बाजी मारली. प्रमोद देशमुख सरपंचपदी विजयी झाले. काटोल तालुक्यात २२ आणि नरखेड तालुक्यात १४ वर राष्टÑवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपनेही २६ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. बेलोना येथे जिल्हा परिषदेचे सभापती उकेश चव्हाण यांच्या गटाचा सफाया झाला. माजी मंत्री रमेश बंग यांच्या रायपूरमध्ये राष्टÑवादी काँग्रेस समर्थित पॅनल विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांच्या गटाला सावंगा (शिवा) येथे विजय मिळाला, तर बोखारा येथे काँग्रेसच्या कुंदा राऊत यांच्या गटाच्या विद्यमान सरपंच अनिता पंडित पुन्हा एकदा सरपंचपदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या येरखेडा या गावात काँग्रेस समर्थित पॅनलने १२ जागा जिंकत एकतर्फी बाजी मारली. येथे सरपंचपदी मंगला कारेमोरे विजयी झाल्या.