शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी ये रुलाये...! नियतीने घेतली अशीही अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 20:08 IST

Nagpur News नियती कधी कुणासोबत कसा खेळ करील याचा नेम नाही, हाच त्यातील सरळसाधा अर्थ. रविवारी शहरातील एका कुटुंबावर नियतीने असाच काहीसा सूड उगवला. तो ज्यालाज्याला कळला, त्याच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

नरेश डोंगरे !

नागपूर : सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या भावस्पर्षी अभिनयाने अजरामर ठरलेला ‘आनंद’ हा चित्रपट पाच दशकांपूर्वी प्रदर्शित झाला. याच चित्रपटात त्यांच्यावर अभिनित झालेले आणि मन्ना डे यांनी गायलेले ‘जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी तो हसाये, कभी ये रुलाये...’ हे आशयपूर्ण गीत आजही जगण्याचे वास्तव पटवून देते. ‘आनंद’मधीलच ‘बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही...’ हा डॉयलॉग अनेकदा अनेक जण अनुभवतात. नियती कधी कुणासोबत कसा खेळ करील याचा नेम नाही, हाच त्यातील सरळसाधा अर्थ. रविवारी शहरातील एका कुटुंबावर नियतीने असाच काहीसा सूड उगवला. तो ज्यालाज्याला कळला, त्याच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

सोनेगाव परिसरात राहणारे रमन रामटेके प्रॉपर्टी डिलिंग करायचे. ते, पत्नी अन् मुलगा शार्दूल एवढाच त्यांचा परिवार. घरची स्थिती बऱ्यापैकी असल्याने रामटेके दाम्पत्याने शार्दूलला शिक्षणासाठी हैदराबादला पाठविले. सारे काही ठिकठाक सुरू असताना रामटेके दाम्पत्य शनिवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले. मात्र, रविवारी सकाळी रमन रामटेकेंचे डोळे उघडलेच नाहीत. ही वार्ता आधी शेजारी अन् नंतर आप्तस्वकियांना देण्यात आली. एकूलता एक मुलगा शार्दूल तीन वर्षांपासून हैदराबाद येथे हॉटेल मॅनेजमेंट करीत होता. त्याची परीक्षा (पेपर) ११ एप्रिलपासून सुरू होणार होती. त्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांची अशी अकाली एक्झिट झाल्याने सारेच जण हादरले. त्याला सांगावं की नको, या द्विधा मन:स्थितीत नातेवाईक होते. मात्र, वडील गेल्याचे त्याला कळवले नाही तर शार्दूलला त्यांचे अंत्यदर्शनही घेता येणार नाही अन् नंतर त्याला तसेच कुटुंबातील सर्वांनाच आयुष्यभर ती खंत घेऊन जगावे लागेल, याचीही सर्वांना कल्पना आली. त्याला वडिलांच्या निधनाची वार्ता कळविण्यात आली. दोन दिवसांवर आलेल्या परीक्षेच्या तयारीत गुंतलेला शार्दूल कशाबशा भावना सांभाळत नागपुरातील घरी पोहोचला. वडिलांचे कलेवर त्याचीच वाट बघत होते. त्याने अंत्यदर्शन घेतले अन् त्याचे वडील अखेरच्या प्रवासाला निघाले.

काळीज फाडणारी परीक्षा!

रमन रामटेके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, असे सांगितले जाते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पत्नीची अवस्था शब्दातीत आहे. त्यामुळे तिला अशा अवस्थेत सोडून पुन्हा हैदराबादला जाऊन परीक्षा देण्याचा विचार शार्दूलने धुडकावला आहे. तिला मानसिक आधार देण्याची आणि स्वत:लाही सांभाळण्याची काळीज फाडणारी परीक्षा अवघ्या २३ वर्षीय शार्दूलवर आली आहे.

-----

टॅग्स :Deathमृत्यू