शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्हा परिषद बरखास्तीचा आदेश चुकीचा : शासनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 21:06 IST

सव्वादोन वर्षानंतर शासनाने जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. शासनाने घेतलेल्या बरखास्तीच्या निर्णयाविरुद्ध जि.प.च्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्य संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यांच्यामते शासनाने काढलेले बरखास्तीचे आदेश चुकीचे आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधक मिळून करणार याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सव्वादोन वर्षानंतर शासनाने जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. शासनाने घेतलेल्या बरखास्तीच्या निर्णयाविरुद्ध जि.प.च्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्य संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यांच्यामते शासनाने काढलेले बरखास्तीचे आदेश चुकीचे आहे.भाजप-सेना युतीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २१ मार्च २०१७ मध्ये संपला. आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला. परंतु आरक्षण ५० टक्क्यावर गेल्याने माजी सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेवर न्यायालयात आक्षेप घेतला. त्याचबरोबर शासनाने दोन ग्राम पंचायतींचा दर्जा उंचावत नगर पालिका आणि नगर पंचायत केले. यालासुद्धा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे निवडणुका घेता आल्या नाही. सरकारने प्रशासक नियुक्त न करता सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ दिली. मुदतवाढीचा कार्यकाळ मात्र निश्चित करण्यात आला नव्हता. सरकारने नंदूरबार, धुळे, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेलाही मुदतवाढ दिली. मुदतवाढीनंतर एका सदस्याचे सदस्यत्त रद्द केल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ योग्य नसल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे शासनाने नागपूरसह पाचही जिल्हा परिषद बरखास्त करण्याचे आदेश काढले. शासनाच्या या आदेशाला जिल्हा परिषदच्या काही माजी सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. यात शिवकुमार यादव, अंबादास उके यांचा समावेश आहे. शिवकुमार यादव यांनी सांगितले की, निवडणूक घेण्याला विरोध नाही. सरकारला जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार नाही. बरखास्तीचा आदेश हा नियमानुसार नाही. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.रात्री उशिरापर्यंत सीईओं जि.प.मध्येजिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर सीईओ संजय यादव, अतिरिक्त सीईओ अंकुश केदार व इतर विभागप्रमुख जिल्हा परिषदेत गुरुवारला रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते़ प्रशासक म्हणून नेमकी भूमिका आणि जबाबदारीची निश्चिती यावेळी करण्यात आली़ ते सातत्याने मंत्रालयीन सूत्रांच्या संपर्कात होते़ प्रशासकपदाचा अनुभव यादव यांच्याही कारकिदीर्तील पहिलाच प्रसंग असल्याने ते नियोजनात व्यस्त होते़ शुक्रवारला सकाळीच त्यांनी विविध विभागप्रमुखांचा आढावा घेतला़ रिक्तपदे, अनुशेष, समायोजन, अनुकंपाचीही चर्चा यावेळी झाल्याची माहिती आहे़जिल्हा परिषदेत शुकशुकाट : समितीच्या सभापतींच्या नावाच्या पाट्याही काढल्याजिल्हा परिषद बरखास्तीचे आदेश ग्रामविकास खात्याने १८ जुलैला निर्गमित केल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट जाणवला. अध्यक्ष, उपाध्यक्षासह चारही समित्यांच्या सभापतींचे स्वीय सहायक यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत ताबडतोब रुजू होण्याचे आदेश सीईओंनी दिले. त्यामुळे स्वीय सहायकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने, दस्तावेजांचा निपटारा करीत होते. समिती सभापतींच्या नावाच्या पाट्याही काढण्यात आल्या होत्या.नागपूर जिल्हा परिषदेने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही समिती सभापतींचे स्वीय सहायक, अधिनस्त कर्मचाऱ्यांना मध्यान्हापूर्वी रुजू होण्याचे आदेश दिल्याने सर्वांची आवरासावर सुरू होती. यामध्ये अध्यक्षांचे स्वीय सहायक सुनील ढेंगे हे पंचायत समिती कुही, कनिष्ठ सहायक चंद्रकांत चरडे पंचायत समिती कळमेश्वर, राजेंद्र काळे पंचायत समिती कळमेश्वर, उपाध्यक्षांचे स्वीय सहायक मिथिलेश देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, कनिष्ठ सहायक ज्ञानेश्वर साळवे तालुका वैद्यकीय अधिकारी कामठी, शिक्षण सभापती उकेश चौहान यांचे सहायक तुकाराम भुसारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प़ नागपूर, कृषी सभापती आशा गायकवाड यांचे सहायक राजेंद्र किंदर्ले हे जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम उमरेड तर समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांचे स्वीय सहायक अशोक रवारे हे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग हिंगणा व महिला बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांचे सहायक नारायण जोगी हे आपल्या मूळ पदस्थापना असलेल्या हिंगणा येथे रुजू झाले़ या सर्व सभापतींच्या नावाच्या पाट्याही शुक्रवारी काढण्यात आल्या होत्या. काही सभापती कार्यालयात आले़ परंतु विभागप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर आल्यापावली परतले़ शासनाच्या आदेशाचे सक्तीचे पालन म्हणून विषय समिती सभापती व त्यांच्या कॅबिनच्या पदनामाच्या प्लेट काढण्याची घाई सुरू होती़ काही सभापतींच्या कॅबिनला दुपारपर्यंतच कुलूप लागले होते़ एकप्रकारे नैराश्य आणि शुकशुकाटाचे वातावरण जिल्हा परिषदेत पहायला मिळाले़अध्यक्षांना अजूनही अपेक्षाजि.प. बरखास्तीचे आदेश आल्यानंतर शुक्रवारी उपाध्यक्षासह सभापतींच्या त्यांच्या कॅबिनपुढच्या पाट्या काढण्यात आल्या होत्या. मात्र अध्यक्ष निशा सावरकर यांना अजूनही शासनाने घेतलेला निर्णय मागे घेईल अशी अपेक्षा असल्यामुळे की काय त्यांनी आपल्या नावाची पाटी सायंकाळपर्यंत काढलेली नव्हती.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय