शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज होणार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेतील कोरोनाबाधितांची संख्या ३० वर पोहचली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा परिषद आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या चर्चेत प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कुंभेजकर म्हणाले, सर्व तालुक्यांवरील यंत्रणा सजग आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. या आठवड्यात बुधवारी महालक्ष्मी पूजनाची सुटी होतीच त्यामुळे इतर चार दिवस वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी आरोग्य विभागाचे कामकाज सुरूच आहे. तसेच गरजेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे.हा लॉकडाऊन पुढे वाढविणार का तसेच जिल्हा परिषद सुरू झाल्यानंतर कर्मचारी उपस्थितीत कपात होणार का याबाबत विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊन हा अंतिम उपाय नाही. जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा फार काळ बंद ठेवणे व्यवहार्य नाही. मात्र लॉकडाऊन वाढविणे आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे हे निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातील. तूर्तास केवळ अत्यावश्यक सेवांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर