शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

देशभर सायकलने फिरत शाकाहाराचा संदेश देण्याचा तरुणाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:41 IST

रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत.

ठळक मुद्दे७५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण हॉटेलची नोकरी सोडून रोहितचे कार्य

ललिता टाटा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत. देशात शाकाहाराचा संदेश देण्याचे कार्य ते करीत आहेत. नागरिकांनी मांसाहार सोडून शाकाहार सुरु करावा यासाठी ते आपल्या अभियानातून जनजागृती करीत आहेत.रोहित इंगळे यांनी आतापर्यंत ७५०० किलोमीटरचे अंतर कापून ते नागपुरात पोहोचले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या अभियानाशी निगडित अनुभव सांगितले. आपण हे अभियान का सुरू केले हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. रोहितने सांगितले, ते दुबईत एका हॉटेलमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. दरम्यान त्यांनी एक लेख वाचला. या लेखात ‘वॅगन’ हा शब्द वाचला. या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी पूर्ण लेख वाचला. या लेखात एक ओळ अशी होती की जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करीत असाल तर मांस खाऊ नका. ही ओळ वाचल्यानंतर ही ओळ खरी असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्या दिवसापासून त्यांनी मांस खाणे बंद केले. एवढेच नव्हे तर शाकाहाराप्रति नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. या विचारातून ते नोकरी सोडून मुंबईला आपल्या घरी परतले. तेथे एक गट तयार केला. पशुंना वाचविण्याच्या दिशेने त्यांनी काम सुरू केले. काही वर्षानंतर हा प्रयत्न कमी असल्याचे त्यांना वाटले. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांनी पुस्तकातून वाचन सुरू केले.एका पुस्तकात आॅस्ट्रेलियात एका व्यक्तीबाबत त्यांनी वाचले. त्यांनी ५ हजार किलोमीटरचे अंतर कापून जनजागृती केली होती. त्या पासून रोहितला प्रेरणा मिळाली. रोहितने सांगितले की, त्यांनी सायकलवर फिरून देशभरात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी खूप तयारी केली.

या राज्यांमध्ये दिला संदेशप्रवास सुरू केल्यानंतर रोहितने आजपर्यंत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू व काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यात जनजागृती केली. तेथून ते नागपुरात पोहोचले. नागपूरात व्हीजन नावाचा ग्रुप तयार केला आहे. यापुढे दक्षिणेकडील राज्यात जाण्याचा मनोदय रोहितने व्यक्त केला.

 

टॅग्स :Socialसामाजिक