युवासेना मेळावा : शेखर सावरबांधे यांचा विश्वास नागपूर : विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका बंद झाल्यामुळे भारतातील लोकशाहीला आवश्यक असलेले नवनवीन सुशिक्षित नेतृत्व मिळेनासे झाले आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनाप्रणित युवासेनाच भविष्यातील सक्षम नेते तयार करण्याचे काम करेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला आहे. रामनगर चौकातील श्रीराम सभागृहात आयोजित दक्षिण-पश्चिम व पश्चिम विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव, नितीन तिवारी, जयसिंग भोसले, संदीप रियाल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. किशोर आकोजवार, दिगांबर ठाकरे व विकास आंबोरे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख मंगेश ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. उपजिल्हा प्रमुख शशिकांत ठाकरे यांनी संचालन केले. अक्षय मेश्राम यांनी आभार मानले. व्यासपीठावर प्रणव तभाने, अनुराग भुसारी, प्रीतम कापसे, आकाश पांडे, कुलदीप उपाध्याय, शशिधर तिवारी, अब्बास अली, अमर चौहान, लाला ससाने, शुभम लखपती, मंदार चुटे आदी उपस्थित होते. यावेळी केवल पटेल, नितीन हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोदसिंग ठाकूर, नरेश उइके, शरद कोल्हे, शिरीन तांबे, विक्की तांबे, रोशन शेख, गौरव सोनुने, प्रेमसागर वाईकर, आकाश सोलंकी, दिनेश मानकर, प्रदीप हातर्डे, शरद वासनिक, राम मिटकर, तुषार नगरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह युवासेनेत प्रवेश घेतला. (प्रतिनिधी)
युवासेनाच सक्षम नेते घडवेल
By admin | Updated: August 19, 2014 00:56 IST