शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:15 IST

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कारखाने तब्बल दोन महिने बंद होते. त्यानंतर मेच्या २० तारखेपासून उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी देणे सुरू केले. परप्रांतीय कामगार आणि मजूर स्वगृही परतल्याने सुरू झालेल्या कारखान्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.आता कारखान्यांमध्ये ५० ते ६० टक्के उत्पादन होत आहे. दोन महिन्यात कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीतील उद्योगांमध्ये ८ ते १० हजार कुशल आणि अकुशल कामगारांची गरज भासणार आहे. त्यातच आयटीआय आणि कौशल्य शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराची मोठी संधी आहे.एका उद्योजकाने सांगितले की, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी असतानाही त्यांच्यात उत्साह दिसत नाही. उद्योजकांची नेहमीच परप्रांतीयांना पसंती राहिली आहे. कारण अन्य राज्यातील कुशल आणि अकुशल कामगार एमआयडीसीच्या लगतच्या वस्त्यांमध्ये एकत्रित राहतात आणि वेळेवर कामगार येतात. आठवडी सुटीव्यतिरिक्त ते अन्य दिवशी सुटी घेत नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत नाही. ही भावना स्थानिक युवकांमध्ये नसते. शहरातून बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये येताना त्यांना अनेक अडचणी आहेत. वाहतुकीसाठी त्यांना जास्त खर्च येतो. याच कारणामुळे फार कमी युवक एमआयडीसीमध्ये काम करण्यास तयार होतात. कोविड-१९ च्या धर्तीवर आता युवकांनी मानसिकता बदलली पाहिजे.युवकांना महा स्वयम पोर्टलमध्ये नोंदणी करावीरोजगारासाठी शिक्षित आणि अशिक्षित युवकांनी शासनाच्या महा स्वयम पोर्टलमध्ये त्यांना हव्या असलेल्या कामाची नोंदणी करावी. त्यानुसार युवकांना खासगी कंपन्यांमध्ये कामासाठी मॅसेज पाठविले जातात. उद्योजक आणि युवक यांचा थेट संवाद होऊन युवकांना रोजगार मिळतो. २०१४ मध्ये सुरू झालेल्या पोर्टलवर दोन लाख युवकांची नोंद आहे. कोविडच्या काळात एक हजार युवकांची नोंद झाली आहे. अनेकांना पोर्टलद्वारे रोजगार मिळाला आहे.प्रभाकर हरडे, सहायक आयुक्त, राज्य शासन कौशल्य विकास.आठ हजार कामगारांची गरज भासणारपुढील दोन महिन्यात कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आठ हजार कामगारांची गरज उद्योगांमध्ये राहणार आहे. याकरिता युवकांनी तयार राहावे. रोजगारासाठी महा स्वयम पोर्टलचा फायदा घ्यावा. कोविड-१९ मुळे युवकांना रोजगाराची संधी चालून आली आहे.प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

टॅग्स :jobनोकरीnagpurनागपूर