शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली.

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या साथीदारासही अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली. पोलिसांनी या हत्येचे सूत्रधार दोन अल्पवयीन आणि त्याचा साथीदार गणेश ऊर्फ कऱ्या विक्की दांडेकर (२४) रा. गिट्टीखदान याला अटक केली आहे. संदीप हिराचंद बावनकर (२४) रा. राजीवनगर असे मृताचे नाव आहे.संदीप खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. संदीपला कही दिवसांपासून मिरगी येत होती. यामुळे त्याने काम सोडले होते. या खुनाचे सूत्रधार दोन बालगुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही खून आणि इतर गुन्हे दाखल आहेत. दुसरा अल्पवयीन सुद्धा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. काही दिवसांपूर्वी घरफोडी करणाऱ्या बालगुन्हेगारासोबत संदीपचा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार संदीप आपल्या गर्लफ्रेण्ड्ससोबत बाईकने जात होता. त्याचवेळी आरोपीने तिला पाहून टोमणा मारला. संदीपने त्याला फटकारत समज दिली. यामुळे आरोपीला प्रचंड राग आला. त्याने संदीपचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या दुसऱ्या अल्पवयीन साथीदारास सांगितली.मंगळवारी संदीपचा मित्र प्रणयचा वाढदिवस होता. यात संदीप आणि त्याचे इतर मित्रही गेले होते. जिथे वाढदिवस साजरा केला जात होता. त्याच्या समोरूनच आरोपी जात होता. कुठल्या तरी गोष्टीवरून संदीप आणि त्याच्या मित्रांशी वाद झाला. यामुळे त्याला आणखीनच राग आला. तो त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार, गणेश दांडेकर व इतर साथीदार काही वेळानंतर पुन्हा तिथे आले. संदीप त्यांना सापडला. ते संदीपला वाद सोडवण्याच्या बहाण्याने गळ्यात हात टाकून राजीवनगरच्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाले. खूप वेळ होऊनही संदीप परत न आल्याने त्याचे साथीदार चिंतेत पडले. ते टेकडी परिसरात गेले. तेव्हा त्यांना हत्या झाल्याचे समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांनी सूचना दिली. तसेच संदीपला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात निघाले. तेव्हा तीन आरोपी दुचाकीने संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. विचारपूस केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.आरोपी गणेशसुद्धा चोरीच्या प्रकरणात सामील आहे. त्याची सासूरवाडी राजीवनगरात आहे. त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी आली होती. पत्नीला भेटायला गणेश आला होता. अल्पवयीन आरोपीसोबत त्याची जुनी मैत्री आहे. त्यांच्या सांगण्यावरून तो घटनास्थळी गेला होता.संदीपचे मित्र आरोपींची संख्या जास्त असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परत आल्यावर संदीप आपल्या मित्रांसोबत राजीवनगर बस स्टँडजवळ उभा होता. त्याचवेळी दहा-बारा युवक आले. ते संदीपच्या मित्रांना मारहाण करू लागले. त्यांना धमकावत तेथून जाण्यास सांगितले. आरोपींची संख्या अधिक असल्याने त्याचे मित्र तेथून निघून गेले. यानंतर संदीपला टेकडी परिसरात नेऊन त्याची हत्या केली.पाच तासात दोन खूनपाच तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने पोलीसही हादरले आहेत. दोन्ही खुन क्षुल्लक वादातून झालेत. खुनासारख्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी अधिकाऱ्यांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसीnagpurनागपूर