शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली.

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या साथीदारासही अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली. पोलिसांनी या हत्येचे सूत्रधार दोन अल्पवयीन आणि त्याचा साथीदार गणेश ऊर्फ कऱ्या विक्की दांडेकर (२४) रा. गिट्टीखदान याला अटक केली आहे. संदीप हिराचंद बावनकर (२४) रा. राजीवनगर असे मृताचे नाव आहे.संदीप खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. संदीपला कही दिवसांपासून मिरगी येत होती. यामुळे त्याने काम सोडले होते. या खुनाचे सूत्रधार दोन बालगुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही खून आणि इतर गुन्हे दाखल आहेत. दुसरा अल्पवयीन सुद्धा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. काही दिवसांपूर्वी घरफोडी करणाऱ्या बालगुन्हेगारासोबत संदीपचा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार संदीप आपल्या गर्लफ्रेण्ड्ससोबत बाईकने जात होता. त्याचवेळी आरोपीने तिला पाहून टोमणा मारला. संदीपने त्याला फटकारत समज दिली. यामुळे आरोपीला प्रचंड राग आला. त्याने संदीपचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या दुसऱ्या अल्पवयीन साथीदारास सांगितली.मंगळवारी संदीपचा मित्र प्रणयचा वाढदिवस होता. यात संदीप आणि त्याचे इतर मित्रही गेले होते. जिथे वाढदिवस साजरा केला जात होता. त्याच्या समोरूनच आरोपी जात होता. कुठल्या तरी गोष्टीवरून संदीप आणि त्याच्या मित्रांशी वाद झाला. यामुळे त्याला आणखीनच राग आला. तो त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार, गणेश दांडेकर व इतर साथीदार काही वेळानंतर पुन्हा तिथे आले. संदीप त्यांना सापडला. ते संदीपला वाद सोडवण्याच्या बहाण्याने गळ्यात हात टाकून राजीवनगरच्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाले. खूप वेळ होऊनही संदीप परत न आल्याने त्याचे साथीदार चिंतेत पडले. ते टेकडी परिसरात गेले. तेव्हा त्यांना हत्या झाल्याचे समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांनी सूचना दिली. तसेच संदीपला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात निघाले. तेव्हा तीन आरोपी दुचाकीने संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. विचारपूस केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.आरोपी गणेशसुद्धा चोरीच्या प्रकरणात सामील आहे. त्याची सासूरवाडी राजीवनगरात आहे. त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी आली होती. पत्नीला भेटायला गणेश आला होता. अल्पवयीन आरोपीसोबत त्याची जुनी मैत्री आहे. त्यांच्या सांगण्यावरून तो घटनास्थळी गेला होता.संदीपचे मित्र आरोपींची संख्या जास्त असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परत आल्यावर संदीप आपल्या मित्रांसोबत राजीवनगर बस स्टँडजवळ उभा होता. त्याचवेळी दहा-बारा युवक आले. ते संदीपच्या मित्रांना मारहाण करू लागले. त्यांना धमकावत तेथून जाण्यास सांगितले. आरोपींची संख्या अधिक असल्याने त्याचे मित्र तेथून निघून गेले. यानंतर संदीपला टेकडी परिसरात नेऊन त्याची हत्या केली.पाच तासात दोन खूनपाच तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने पोलीसही हादरले आहेत. दोन्ही खुन क्षुल्लक वादातून झालेत. खुनासारख्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी अधिकाऱ्यांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसीnagpurनागपूर