शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

तरुणांनो, कोरोनापासून सावध व्हा; नागपुरात २१ ते ४० वयोगटांत वाढत आहेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 09:46 IST

Coronavirus in Nagpur कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यात मागील लाटेच्या तुलनेत या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे, आता मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यात ५३, तर एप्रिल महिन्यात १७१ बळी

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यात मागील लाटेच्या तुलनेत या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे, आता मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. एकट्या मेडिकलमध्ये मार्च महिन्यात २१ ते ४० वयोगटांत ५३ तर एप्रिल महिन्यात याच वयोगटात १७१ तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. यामुळे तरुणांनो, कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाचा संसर्ग जीवघेणा ठरतो. हे खरे असले, तरी वस्तुस्थिती बदलत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ज्येष्ठांसोबतच तरुणांमध्येही वाढत आहे. तज्ज्ञाच्या मते, कोरोना विषाणूमध्ये झालेला बदल यामागील एक कारण आहे. सोबतच ४५ वर्षांवरील लोकांचे होत असलेले लसीकरण, त्यांच्या कोरोनाविषयी असलेली गंभीरता, यामुळे प्रतिबंधक उपाययोजनाचे ते पालन करतात. त्या तुलनेत तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत चांगली असते, असा समज असल्याने काही तरुण मास्क, सॅनिटायझेशनचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नियम टाळतात, शिवाय लक्षणांकडेही दुर्लक्ष करतात. गंभीर झाल्यावरच रुग्णालयात येत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

-मार्च महिन्यात ३१ ते ४० वयोगटांत ४१ मृत्यू

मार्च महिन्यात मेडिकलमध्ये २१ ते ३० वयोगटांत १२ तर ३१ ते ४० वयोगटांतील ४१ असे एकूण ५३ रुग्णांचे बळी गेले, याशिवाय ४१ ते ५० वयोगटांतील ६०, ५१ ते ६० वयोगटांतील ९०, ६१ ते ७० वयोगटांतील ९८ तर ७० व त्यापुढील वयोगटांतील ८६ रुग्णांचे मृत्यू झाले.

-एप्रिल महिन्यात ३१ ते ४० वयोगटांत ११९ मृत्यू

मेडिकलमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. १,३६७ मृत्यूची नोंद झाली. यात सर्वाधिक मृत्यू ५१ ते ६० वयोगटांतील आहेत. यातील ३१७ रुग्णांचे बळी गेले आहेत, परंतु मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात तरुणांमध्ये मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते ३० वयोगटांत ५२ तर ३१ ते ४० वयोगटांत ११९ असे एकूण १७१ रुग्णांचे बळी गेले आहेत.

-तरुणांच्या मृत्यूचे कारण

:: उशिरा निदान

:: उपचारातही उशीर

:: निदान न झालेला मधुमेह, उच्च रक्तदाब

:: हायपो-थायरॉयडिझम

:: लठ्ठपणा

 

कोरोनाबाधित तरुणांच्या मृत्युमागे उशिरा निदान व उपचारातही उशीर हे मुख्य कारण प्राथमिक स्तरावर आढळून आले आहे, याशिवाय निदान न झालेला मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा कारणांमुळे कोरोनाबाधित तरुणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. तरुणांनी घराबाहेर पडताना मास्कचा योग्य वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशनचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

-डॉ. प्रशांत पाटील

विभाग प्रमुख मेडिकल

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस