शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे नागपुरात युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:22 IST

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देशांतिनगरातील घटना : पाच आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. मृत शांतिनगर येथील रहिवासी ३० वर्षीय आशिष नामदेव देशपांडे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज मेश्राम, निखील मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम व आदर्श ढोके आहे.

नालंदा चौक परिसरातील वस्तीमध्ये अरुंद गल्ल्या आहे. येथूनच मृत आशिषचे येणेजाणे होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आशिषचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर शांतिनगर पोलीस घटनास्थळी पोहचले, पण आशिष तेथून निघून गेला होता. पोलीस गेल्यानंतर पुन्हा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो आला. पुन्हा त्याच महिलेशी वाद घालू लागला. त्या महिलेने वस्तीतील लोकांना फोन करून आशिष आल्याचे कळविले. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणारेही तिथे पोहचले. त्यांनी आशिषवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर रॉड आणि फर्शीने वार केला. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांच्या ताब्यातून तो पळू शकला नाही. आशिषचा वाद झाल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी अर्पिता घटनास्थळी पोहचली. आरोपींकडून हल्ला होत असल्याचे बघून तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलीस येत असल्याचे बघून हल्लेखोर तेथून पळून गेले.अनेक वेळा झाले होते वादआशिष वेल्डिंगचे काम करीत होता. पोलीस सूत्रांच्या मते आशिष पूर्वी गुन्हेगारीत लिप्त होता. त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. आशिष नालंदानगर चौक परिसरातील वस्तीतून ये-जा करीत होता. वस्तीतील गल्ली अतिशय अरुंद असतानाही तो वेगाने दुचाकी चालवित होता. त्यामुळे अपघात होण्याची भीती होती. यापूर्वी आशिषसोबत बरेचदा वस्तीतील लोकांचा वाद झाला होता. तरीसुद्धा तो वेगाने दुचाकी चालवित होता.आरोपी खोटी माहिती देत आहेआशिषच्या कुटुंबीयांच्या मते आरोपी स्वत:ला वाचविण्यासाठी खोटी माहिती देत आहे. आशिषकडे अ‍ॅक्टीव्हा गाडी होती. गल्ली अरुंद असल्याने वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही. नालंदानगर चौकात आशिषच्या मुली शिकवणीला जातात. मुलींना शिकवणीला पोहचवून देण्यासाठी तो गल्लीतून ये-जा करीत होता. आरोपींचा परिसरात दबदबा आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. आशिषच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, त्याचा गुन्हेगारीशी कुठलाही संबंध नव्हता. आरोपींशी त्याचा थोडाफार वाद झाला होता. त्याच्या हत्येमध्ये अजूनही काही लोक सहभागी आहे.मुली झाल्या अनाथआशिषला दोन मुली आहे. तो एकटा मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई भंडाऱ्याला गावी गेली होती. घटनेपूर्वी तो पत्नीसोबत बाजार घेऊन आला होता. पत्नीने चहापत्ती संपली असल्याचे सांगितल्यामुळे तो घराबाहेर पडला होता. त्याच्या हत्येमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून