शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे नागपुरात युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:22 IST

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देशांतिनगरातील घटना : पाच आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. मृत शांतिनगर येथील रहिवासी ३० वर्षीय आशिष नामदेव देशपांडे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज मेश्राम, निखील मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम व आदर्श ढोके आहे.

नालंदा चौक परिसरातील वस्तीमध्ये अरुंद गल्ल्या आहे. येथूनच मृत आशिषचे येणेजाणे होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आशिषचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर शांतिनगर पोलीस घटनास्थळी पोहचले, पण आशिष तेथून निघून गेला होता. पोलीस गेल्यानंतर पुन्हा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो आला. पुन्हा त्याच महिलेशी वाद घालू लागला. त्या महिलेने वस्तीतील लोकांना फोन करून आशिष आल्याचे कळविले. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणारेही तिथे पोहचले. त्यांनी आशिषवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर रॉड आणि फर्शीने वार केला. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांच्या ताब्यातून तो पळू शकला नाही. आशिषचा वाद झाल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी अर्पिता घटनास्थळी पोहचली. आरोपींकडून हल्ला होत असल्याचे बघून तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलीस येत असल्याचे बघून हल्लेखोर तेथून पळून गेले.अनेक वेळा झाले होते वादआशिष वेल्डिंगचे काम करीत होता. पोलीस सूत्रांच्या मते आशिष पूर्वी गुन्हेगारीत लिप्त होता. त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. आशिष नालंदानगर चौक परिसरातील वस्तीतून ये-जा करीत होता. वस्तीतील गल्ली अतिशय अरुंद असतानाही तो वेगाने दुचाकी चालवित होता. त्यामुळे अपघात होण्याची भीती होती. यापूर्वी आशिषसोबत बरेचदा वस्तीतील लोकांचा वाद झाला होता. तरीसुद्धा तो वेगाने दुचाकी चालवित होता.आरोपी खोटी माहिती देत आहेआशिषच्या कुटुंबीयांच्या मते आरोपी स्वत:ला वाचविण्यासाठी खोटी माहिती देत आहे. आशिषकडे अ‍ॅक्टीव्हा गाडी होती. गल्ली अरुंद असल्याने वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही. नालंदानगर चौकात आशिषच्या मुली शिकवणीला जातात. मुलींना शिकवणीला पोहचवून देण्यासाठी तो गल्लीतून ये-जा करीत होता. आरोपींचा परिसरात दबदबा आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. आशिषच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, त्याचा गुन्हेगारीशी कुठलाही संबंध नव्हता. आरोपींशी त्याचा थोडाफार वाद झाला होता. त्याच्या हत्येमध्ये अजूनही काही लोक सहभागी आहे.मुली झाल्या अनाथआशिषला दोन मुली आहे. तो एकटा मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई भंडाऱ्याला गावी गेली होती. घटनेपूर्वी तो पत्नीसोबत बाजार घेऊन आला होता. पत्नीने चहापत्ती संपली असल्याचे सांगितल्यामुळे तो घराबाहेर पडला होता. त्याच्या हत्येमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून