शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

तरुण पिढीसोबत तिच्या भाषेत बोललं गेलं पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:28 IST

देशाच्या विकासाचे मॉडेल म्हणून आज आपण जे काही स्वीकारलं आहे ते गांधींच्या विचारांमध्ये न बसणारं आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या १५० जयंती वर्षारंभानिमित्त सेवाग्रामच्या नई तालीमचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांची घेतलेली मुलाखत.

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूरमहात्मा गांधींनी जो विचार मांडला त्यासमोर आज कुठली आव्हाने आहेत आणि आज त्या विचारांची किती उपयुक्तता आहे असा प्रश्न आहे. तर देशाच्या विकासाचे मॉडेल म्हणून आज आपण जे काही स्वीकारलं आहे ते गांधींच्या विचारांमध्ये न बसणारं आहे. हे मॉडेल आपण काही एका रात्रीत स्वीकारलेलं नाही. आपण हे विकासाचं मॉडेल जे स्वीकारलं आहे ते कसं असावं हे ठरवून काही लोक इथून गेलेत, देश सोडून गेलेत... त्यांनी जे विकासाचं मॉडेल ठरवलं होतं तेच आपण चालू ठेवलं. आपल्या देशासाठी विकासाचं जे मॉडेल आवश्यक होतं, ज्याची चर्चा हिंद स्वराजमध्ये आहे किंवा नंतरच्या सगळ्या १८४७ पासून म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळापासून १९४७ पर्यंत, म्हणजे महात्मा ते महात्मा यांच्या काळात या देशात जे विचारमंथन झालं, त्यातून देशासाठी विकासाचं मॉडेल जे साधारण १९२० च्या सुमारास पुढं आलं त्याला नाकारणारी जी आजची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था रुजवली जात आहे, तेच गांधी विचारांसमोरचं खरं आव्हान आहे.आपण सामाजिक समतेचा प्रश्न कधी समजून घेणार? मग आजच्या शिक्षण पद्धतीत काय प्रश्न आहेत ते शोधून कोण सोडवणार... गांधी विचार तुम्ही बाजूला ठेवा. पण या प्रश्नांची उत्तरं नाही सापडली तर उद्या या जगात हिंसेव्यतिरिक्त काही उरणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. जी शिक्षण पद्धत बेरोजगारीचा फुगा दिवसेंदिवस फुगवते आहे, ती चालणार आहे का आपल्याला, आरोग्याची ही पद्धत योग्य आहे का सगळ््यांसाठी... आता जी पाण्याची व्यवस्था करत आहोत ती दीर्घकालीन आहे का? धरण भरलं तर शहरातले लोक खूष होतात. पण शेतकऱ्याचे काय? निसर्गाच्या असंतुलनाचे काय? विकासाच्या या मॉडेलमुळे निर्माण होणारे हे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पिढीसाठी सोडून देणार आहोत काय? हे सगळे प्रश्न तुमच्या-माझ्या नातवंडांना भेडसावणार आहेत. तुम्हीच विचार करा, तुम्हाला कसा विकास पाहिजे. त्याचा विचार केला की मग गांधी विचार आजच्या काळात संयुक्तिक आहे की नाही हे तुम्हाला कळेल.मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी एका शिबिरासाठी जाणार होतो. सहज माझ्या नातवाला म्हटलं, तुझ्यासाठी काय आणू? तो म्हणाला काहीच नको. तुम्ही फार तर ते खादीचे शर्ट किंवा कुडते आणाल.मी म्हटलं ठीक आहे. तू एक सांग आपल्या जगातलं पाणी वाचणं महत्त्वाचं वाटतं का तुला? माझा नातू हो म्हणाला. मी म्हटलं, खादीसाठी किती पाणी लागतं आणि तू जे वापरतोस ते सिंथेटिक कपडे वापरतो त्याच्या उत्पादनासाठी किती पाणी लागतं हे तुला पाहता येईल का? तू गुगल सर्च करून पाहा. शिवाय मोठमोठ्या कापड कारखान्यांमधील वेस्ट हे आपण नद्यांमध्ये सोडतो. केमिकल वेस्टमुळे होणारी हानी आपण नेहमी वाचतच असतो. माझा नातू विचारात पडला.मग म्हणाला, दादा, आप मेरे लिये दो ड्रेस जरुर लाना... त्यामुळे मला असं वाटतं, की नुसतं गांधी विचार, विनोबा विचार असे न सांगता, तरुण पिढीच्या भाषेत त्यांना सांगितले गेले तर ते अधिक रुजतील व स्वीकारले जातील.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी