शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

होय..पावसाळा संपला अन राज्यातील ९ जिल्ह्यांत टॅंकरने पाणीपुरवठा

By योगेश पांडे | Updated: December 8, 2023 16:49 IST

राज्य शासनानेच विधानपरिषदेत ही कबुली दिली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीसमस्या निर्माण होण्याचीच भिती आहे.

नागपूर : राज्य शासनाने ‘हर घर जल’ व ‘जलजीवन मिशन’अंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र या वर्षी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आणि ९ जिल्ह्यांतील ३१४ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. राज्य शासनानेच विधानपरिषदेत ही कबुली दिली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीसमस्या निर्माण होण्याचीच भिती आहे.

राजेश राठोड, भाई जगताप, अभिजीत वंजारी इत्यादी सदस्यांनी राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे-वाड्यांबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तरातून शासनाची भूमिका मांडली. ऑक्टोबरच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ३१४ गावे व ९९२ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. ३५ शासकीय व २८९ खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८७ टॅंकर्सने पुरवठा करण्यात आला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे शासनाच्या उत्तरात नमूद आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार