शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

"होय आम्ही गांधीवादी क्रांतिकारी आहोत पण बंदुकधारी नाही" तुषार गांधी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर

By आनंद डेकाटे | Updated: September 1, 2025 20:06 IST

तुषार गांधी : दीक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान संविधान सत्याग्रह पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : होय आम्ही गांधीवादी हे क्रांतिकारकच आहोत. पण बंदुकधारी नाही म्हणून सरकारला घाबरण्याची काही गरज नाही, या शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

समाजात शांतता आणि सामाजिक सौहार्द निर्माण व्हावा यासाठी तुषार गांधी यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी नागपूर ते सेवाग्राम (वर्धा) दरम्यान २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'संविधान सत्याग्रह पदयात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेबाबतची माहिती देण्यासाठी ते सोमवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गांधीवादी संस्थेमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता तुषार गांधी म्हणाले, गांधीवादी हे देशभक्त क्रांतीकारक आहेत. क्रांतिकारक हे सत्तेमध्ये बसलेल्यांची झोप उडवतात. म्हणून सत्तेत बसलेले क्रांतिकारकांना घाबरतात. मुख्यमंत्री ज्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळेही ते क्रांतीकारकांना घाबरतात. माओवादीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, माओवादी हे असामानते विरोधात लढणारे क्रांतिकारी आहेत. परंतु व्यक्तिगतरित्या हिंसा आम्हाला मान्य नाही. व्यवस्थेविरोधात लढणाऱ्यांना प्रस्थापिकतांकडून नेहमीच वेगवेगळी दूषण दिली जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या यात्रदरम्यान शेतकरी, बिहारमधील एसआयआरसह सर्व ज्वलंत मुद्यांवर चर्चा केली जाईल. पदयात्रेत इंडिया आघाडीच्या सर्व घटक दलांसह संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व संघटना आणि आंबेडकरी विचारांच्या संघटनांनाही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पदयात्रेचा लागो, गीत आणि गुगल फाॅर्मच्या लिंकचे लोकार्पण करण्यात आले. पत्रपरिषदेला पदयात्रा समन्वयक संदेश सिंगलकर, गुड्डी एस्सल, जगजीत सिंग, अविनाश काकडे, अतुल शर्मा, सुदाम पवार, शरद कदम, वंदन गडकरी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने विश्वसनीयता गमावली

मतदार यादी आणि निवडणूक संबंधात जे काही मुद्दे उपस्थित झाले. त्याबाबत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीची भूमिका घेतली आहे, त्यावरून निवडणुक आयोगाने विश्वसनीयता गमावलेली असल्याची टीकाही तुषार गांधी यांनी यावेळी केली. वोट चोर... या मुद्द्याने बिहारमध्ये जनआंदोलनाचे रूप घेतल्याचेही ते म्हणाले.

अशी राहील पदयात्रा

पदयात्रा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी नागपूर ते सेवाग्राम आश्रम, वर्धा अशी निघणार आहे. या पदयात्रेत ७५ मुख्य पदयात्री राहणार असून त्यांची निवड १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत गुगल फॉर्मद्वारे केली जाईल. प्रत्येक पदयात्रेसाठी गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे. त्याव्यतिरिक्त कितीही पदयात्री सहभागी होऊ शकतील, असे मुंबई येथील गुड्डी यांनी सांगितले. या दरम्यान बुटीबोरी, केळझर व नालवाडी येथे जाहीर सभाही होणार आहे. याशिवाय २८ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक ते संविधान चौक मशाल यात्रा काढण्यात येणार असून तेथेही सभा होईल. 

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahatma Gandhiमहात्मा गांधी