शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:58 IST

भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत.

ठळक मुद्देआत्मनिर्भर महिला : गांधी जयंतीला होणार एक लाख दिव्यांची सजावटउमरेड तालुक्यातील महिलांची झेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत. कोरोना संक्रमणात पसरलेल्या अंधारात चाचपडणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या महिला पणत्यांचा आधार देणार आहेत. यंदाची नवरात्र-दिवाळी त्यांनीच केलेल्या पणत्यांनी उजळणार आहे.

नागपुरात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था निसर्ग विज्ञान मंडळाच्या मार्गदर्शनात उमरेड तालुक्यातील कष्टकरी महिलांना स्वयंभू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंडळाच्या मार्फत गोमय वस्तूंच्या निर्मितीवर बऱ्याच काळापासून संशोधन सुरू आहे आणि त्या संशोधनातून निर्मित वस्तूंना उद्योगाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने ‘गोमय समृद्धी’चा नारा बुलंद करण्यात येत आहे. गाय आणि शेतीवर निर्भर उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्यातच आत्मनिर्भरतेच्या घोषणांनी या प्रयत्नांना बळ दिले. दरम्यान गणपतीच्या मूर्तीही शेण, माती, गोमूत्र आदी पंचगव्याच्या माध्यमातून बनविण्यात आल्या. आता पुढे नवरात्र आणि दिवाळी येत आहे. या काळात घरोघरी दिव्यांची गरज भासणार आहे. त्यातच वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाने यंदा गांधी जयंतीला एक लाख पणत्या उजळण्याचा प्रण केला आहे. हा संयोग जोडत या महिला हे दिवे तयार करत आहेत. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी पुतळा ते बापू कुटी दरम्यान एक लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत आणि या पणत्या उमरेडच्या महिला साकारत आहेत. २५ महिलांची ही फौज मिळेल त्या वेळेत हे दिवे साकारत आहेत. त्यातच पुढे नवरात्र आणि दिवाळीही असणार आहे. त्यामुळे, इवल्याशा पणत्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला प्रखर करणार आहेत.ऋतुगंध गटातील महिला करत आहेत काम - विजय घुगेमधल्या काळात महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने उमरेड तालुक्यातील काही गावातील महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यातून २५ महिलांचा ऋतुगंध हा गट तयार करण्यात आला. या महिला पूर्णवेळ पणत्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. कौशल्याला व्यावसायिक जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे निसर्ग विज्ञान मंडळाचे विजय घुगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकल्पाला ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे, नेत्रवनचे समन्वयक दीपक शाहू यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Diwaliदिवाळीnagpurनागपूर