शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:58 IST

भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत.

ठळक मुद्देआत्मनिर्भर महिला : गांधी जयंतीला होणार एक लाख दिव्यांची सजावटउमरेड तालुक्यातील महिलांची झेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लीलया उचलून धरत उमरेड तालुक्यातील महिला स्वयंभू होण्याच्या दिशेने अग्रेसर झाल्या आहेत. कोरोना संक्रमणात पसरलेल्या अंधारात चाचपडणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या महिला पणत्यांचा आधार देणार आहेत. यंदाची नवरात्र-दिवाळी त्यांनीच केलेल्या पणत्यांनी उजळणार आहे.

नागपुरात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था निसर्ग विज्ञान मंडळाच्या मार्गदर्शनात उमरेड तालुक्यातील कष्टकरी महिलांना स्वयंभू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंडळाच्या मार्फत गोमय वस्तूंच्या निर्मितीवर बऱ्याच काळापासून संशोधन सुरू आहे आणि त्या संशोधनातून निर्मित वस्तूंना उद्योगाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने ‘गोमय समृद्धी’चा नारा बुलंद करण्यात येत आहे. गाय आणि शेतीवर निर्भर उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्यातच आत्मनिर्भरतेच्या घोषणांनी या प्रयत्नांना बळ दिले. दरम्यान गणपतीच्या मूर्तीही शेण, माती, गोमूत्र आदी पंचगव्याच्या माध्यमातून बनविण्यात आल्या. आता पुढे नवरात्र आणि दिवाळी येत आहे. या काळात घरोघरी दिव्यांची गरज भासणार आहे. त्यातच वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाने यंदा गांधी जयंतीला एक लाख पणत्या उजळण्याचा प्रण केला आहे. हा संयोग जोडत या महिला हे दिवे तयार करत आहेत. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीला सेवाग्राम येथील गांधी पुतळा ते बापू कुटी दरम्यान एक लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत आणि या पणत्या उमरेडच्या महिला साकारत आहेत. २५ महिलांची ही फौज मिळेल त्या वेळेत हे दिवे साकारत आहेत. त्यातच पुढे नवरात्र आणि दिवाळीही असणार आहे. त्यामुळे, इवल्याशा पणत्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला प्रखर करणार आहेत.ऋतुगंध गटातील महिला करत आहेत काम - विजय घुगेमधल्या काळात महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने उमरेड तालुक्यातील काही गावातील महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यातून २५ महिलांचा ऋतुगंध हा गट तयार करण्यात आला. या महिला पूर्णवेळ पणत्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. कौशल्याला व्यावसायिक जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे निसर्ग विज्ञान मंडळाचे विजय घुगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकल्पाला ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे, नेत्रवनचे समन्वयक दीपक शाहू यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Diwaliदिवाळीnagpurनागपूर