शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

यावर्षीही मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला; बंगालच्या उपसागरातील बदल कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 18:35 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास २९ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे २९ नंतरच हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मान्सूनच्या अनियमिततेवरून हवामान बदलामुळे हाेणाऱ्या परिणामांचे संकेत सहज लक्षात येतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे व ताे यावर्षीही कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास २९ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (This year too, the return journey of the monsoon was long; Causing changes in the Bay of Bengal)

साधारण १७ सप्टेंबरदरम्यान पावसाळ्याचा परतीचा काळ गृहित धरला जाताे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून यात बदल हाेत आहेत. हवामान विभाग दिल्लीचे के. एस. हाेसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीही परिस्थिती बदललेली आहे. वातावरणात एकापाठाेपाठ एक बदल घडून येत आहेत. सध्या मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि पाऊसही हाेत आहे. यामुळे विदर्भातही पावसाळी वातावरण आहे. यानंतर शनिवारी, रविवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ते वायव्य दिशेला सरकत आहे. ही परिस्थिती विदर्भात पावसासाठी कारणीभूत ठरली आहे.

मान्सूनदरम्यान विदर्भ व महाराष्ट्रात एकतर अरबी समुद्रात बदल झाल्याने किंवा दुसरे बंगालच्या उपसागरात बदल झाल्याने पावसाळी वातावरण तयार हाेते. सध्या अरबी समुद्रातील वातावरण शांत आहे, पण बंगालच्या उपसागरात सातत्याने बदल घडत आहेत. यामुळे मध्य प्रदेश, रायपूर, विदर्भ, मराठवाडा या भागात पावसाचा जाेर कायम आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये चार आठवड्यांचे अनुमान नाेंदवले आहे. दि. १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दि. २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात चांगला पाऊस हाेईल. दि. १ ते ७ ऑक्टाेबरदरम्यान उत्तर-पश्चिम तसेच मध्य भारतात पावसाचे अनुमान आहे. यावरून राजस्थानकडून सुरू हाेणारा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्ह आहेत. दि. ८ ते १४ ऑक्टाेबरदरम्यान पावसाचा जाेर ओसरेल पण देशात सर्वत्र सामान्य पाऊस हाेण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

साेमवारी, मंगळवारी विदर्भात जाेरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. २०, २१ सप्टेंबरदरम्यान विदर्भ, मध्य प्रदेशात चांगला पाऊस हाेईल. साेमवारी पूर्व विदर्भ म्हणजे गाेंदिया, भंडारा, गडचिराेली भागात जाेरदार पाऊस हाेईल. त्यानंतर मंगळवारी नागपूरसह वर्धा, अमरावती, अकाेला या भागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस