शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आंदोलन करून चित्रपट बंद पाडणे चुकीचे

By admin | Updated: December 21, 2015 03:17 IST

एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण करून तो बंद पाडणे चुकीचे आहे. छोट्याशा बाबीला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरविले पाहिजे.

पार्श्वगायक सुरेश वाडकर : आजचे संगीत डान्स अ‍ॅटमनागपूर : एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण करून तो बंद पाडणे चुकीचे आहे. छोट्याशा बाबीला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरविले पाहिजे. चित्रपटात एखादी बाब चुकीची असेल तर ती संबंधितांना पटवून द्यायला हवी, त्याबाबत चर्चा करायला हवी. चित्रपट बंद पाडणे ही लोकशाही नाही, असे मत सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले. संगीतकार दत्ता हरकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘स्वर अमृताचे’ या सीडीचे लोकार्पण करण्यासाठी वाडकर नागपुरात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबाबत वाद सुरू असला तरी त्याने चित्रपटाचे महत्त्व कमी होत नाही. सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी दिली आहे. पण हल्ली वाद निर्माण करण्याचाच पायंडा पडला आहे. संवाद एकूणच समाजात कमी झाला आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून समोर येणाऱ्या गायकांची तयारीच नसते. पण अशा शोमधून अमाप प्रसिद्धी चुकीच्या गायकांना मिळते आणि रियाज करून शिकलेल्या गायकावर मात्र अन्याय होतो. यामुळे रिअ‍ॅलिटी शोत जिंकलेल्या गायकाला पैसा देण्यापेक्षा चांगल्या गुरूकडे शिकण्यासाठी पाठवायला हवे. रिमिक्स हे शुद्ध संगीत नाही. त्यावर केवळ नाच करता येतो. उद्या एखाद्याच्या अंत्ययात्रेत लोक रिमिक्स लावून नाचतील की काय, अशी भीती वाटते. पुरस्कार वापसीबाबत आपण काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दत्ता हरकरे, कनका गडकरी, अनुजा केदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिक प्रकरणाबाबत बोलणे उचित नाहीनाशिकचे जमीन प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले पण माझी बाजू मी मांडली आहे. शासनानेच त्याबाबत निर्णय घ्यावा. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे उचित नाही.