शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: April 10, 2015 02:06 IST

पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

नागपूर : पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी आपापली दारे बंद करून घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना अवघ्या १०० मीटर अंतरावर उगले बंधूंच्या कुटुंबीयांना बराच वेळपर्यंत काहीही माहीत नव्हते. एकनाथचा भाचा पान सेंटरवर येत असताना त्याला संजय आणि केशवचे मृतदेह दिसले. त्यामुळे ओरडतच तो घरी गेला. वृद्ध आई आणि तिच्या तिन्ही सुना घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनाही कळविण्यात आले. माहिती कळताच सक्करदरा पोलीस पोहोचले. यावेळी एकनाथला धुगधुगी होती. त्याला एका वाहनात घालून मेडिकलला नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी एकनाथलाही मृत घोषित केले. परिसरच नव्हे, पोलिसही हादरलेया तिहेरी हत्याकांडाने सक्करदरा, बिडीपेठ परिसरातील नागरिकच नव्हे तर पोलीस दलही हादरले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलीस आयुक्त के.के. पाठक तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिहेरी हत्याकांड गुन्हेगारांमधील उफाळलेल्या वादाचा परिणाम असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेगारांमधील वैमनस्यावरून हे हत्याकांड घडल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. मात्र, हा टोळीयुद्धाचा प्रकार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)उगले परिवारात आक्रोशएकनाथ, संजय आणि केशव हे तिघेही भाऊ एकत्र राहात होते. एकनाथ सर्वात मोठा असला तरी सर्वात आधी लग्न संजयचे झाले होते. त्यामुळे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकनाथला एक मुलगा आहे तर, केशवची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिला कोणत्याही दिवशी मूल होऊ शकते. त्यामुळे उगले परिवारात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी होती. मात्र, हे आक्रित घडले. तीनही भाऊ एकाच वेळी निर्घृणपणे मारले गेल्यामुळे तिघांच्या पत्नी तसेच वृद्ध आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे ती हा आक्रोश गप्पपणे बघत होती. त्यांना या भयावह घटनेची कल्पनाच नव्हती. उगले परिवाराचा आक्रोश परिसराला हलवून सोडणारा होता.