शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: April 10, 2015 02:06 IST

पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

नागपूर : पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी आपापली दारे बंद करून घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना अवघ्या १०० मीटर अंतरावर उगले बंधूंच्या कुटुंबीयांना बराच वेळपर्यंत काहीही माहीत नव्हते. एकनाथचा भाचा पान सेंटरवर येत असताना त्याला संजय आणि केशवचे मृतदेह दिसले. त्यामुळे ओरडतच तो घरी गेला. वृद्ध आई आणि तिच्या तिन्ही सुना घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनाही कळविण्यात आले. माहिती कळताच सक्करदरा पोलीस पोहोचले. यावेळी एकनाथला धुगधुगी होती. त्याला एका वाहनात घालून मेडिकलला नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी एकनाथलाही मृत घोषित केले. परिसरच नव्हे, पोलिसही हादरलेया तिहेरी हत्याकांडाने सक्करदरा, बिडीपेठ परिसरातील नागरिकच नव्हे तर पोलीस दलही हादरले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलीस आयुक्त के.के. पाठक तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिहेरी हत्याकांड गुन्हेगारांमधील उफाळलेल्या वादाचा परिणाम असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेगारांमधील वैमनस्यावरून हे हत्याकांड घडल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. मात्र, हा टोळीयुद्धाचा प्रकार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)उगले परिवारात आक्रोशएकनाथ, संजय आणि केशव हे तिघेही भाऊ एकत्र राहात होते. एकनाथ सर्वात मोठा असला तरी सर्वात आधी लग्न संजयचे झाले होते. त्यामुळे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकनाथला एक मुलगा आहे तर, केशवची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिला कोणत्याही दिवशी मूल होऊ शकते. त्यामुळे उगले परिवारात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी होती. मात्र, हे आक्रित घडले. तीनही भाऊ एकाच वेळी निर्घृणपणे मारले गेल्यामुळे तिघांच्या पत्नी तसेच वृद्ध आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे ती हा आक्रोश गप्पपणे बघत होती. त्यांना या भयावह घटनेची कल्पनाच नव्हती. उगले परिवाराचा आक्रोश परिसराला हलवून सोडणारा होता.