शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 15:01 IST

गडकरी म्हणाले, दिवस कितीही वाईट आले तरी काम करण्यावर भर हवा.

नागपूर : आपली विचारधारा पक्की भाजपची आहे. विद्यार्थी नेता असताना एकदा डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी चर्चा सुरू होती. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे व तुम्ही चांगले व्यक्ती आहात; परंतु तुम्ही चुकीच्या राजकीय पक्षात आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये या, असे ते मला म्हणाले. त्यावर ‘मी विहिरीत जीव देईल, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेस पक्षाची विचारधाराच आवडत नाही,’ असे उत्तर त्यांना दिल्याची आठवण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

वायपीओस साऊथ एशियाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आयुष्यात अनेक संघर्ष येतात व लढत राहायला हवे. मानवी संबंध ही व्यवसाय, समाजकार्य व राजकारणातील सर्वांत मोठी ताकद आहे. कधीही ‘युज ॲंड थ्रो’ असे काम करू नये. ज्याचा एकदा हात पकडला, त्याची साथ कितीही वाईट दिवस आले तरी, सोडायला नको.

आयुष्यात काम करत असताना आत्मविश्वास व सकारात्मकता असली पाहिजे, मात्र अहंकार नको. कुणीही परफेक्ट नसतो, ही बाबदेखील लक्षात घ्यायला हवी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी कधी वाईट परिस्थिती येते व चढउतार होतात, मात्र आपण आपले काम करत राहायला हवे. एखाद्या वेळी पराभव झाला तर तो मनुष्य संपत नाही; मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करणे सोडतो किंवा युद्धभूमीतून माघार घेतो, तेव्हाच तो हरतो. विश्वसनीयता, प्रामाणिकपणा व लोकांचे ‘गुडविल’ हेच सर्वांत मोठे भांडवल आहे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस