शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जागतिक वन्यजीव दिवस विशेष; २०० वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 07:00 IST

Nagpur News २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे.

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पात ५५ टक्के मृत्यू

निशांत वानखेडे

नागपूर : मागील काही वर्षांत वाघांची संख्या वाढण्यासह व्याघ्र शिकारीवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, मागील १० वर्षांचे आकडे पाहता २०० च्यावर वाघांचे बळी शिकाऱ्यांनी घेतले आहेत. २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे. भारतात वन्यजीवांच्या निसर्गचक्रात वाघ हा प्रमुख घटक असल्याने त्याचे महत्त्व कायम अधाेरेखित हाेत आले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी १००८ वाघांचा मृत्यू झाला. २०२० पर्यंत ४१७ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या काळात १०८ वाघांचा बळी गेला. ४४ अनैसर्गिक तर ७३ वाघ उपचारादरम्यान मृत पावले. २०२० पर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या आत ४७८ म्हणजे ५५.७८ टक्के वाघांचा जीव गेला. व्याघ्र प्रकल्पाबाहेर २७१ म्हणजे ३१.६२ टक्के, तर १२.६० टक्के विजेच्या धक्क्याचे बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी ८८.९१ टक्के प्रकरणे शवविच्छेदन व फाॅरेन्सिक अहवालानंतर बंद करण्यात आली असून, ११.०९ टक्के प्रकरणे प्रलंबित असल्याचा एनटीसीएचा अहवाल आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

२०१२ ते २०२२ पर्यंत दहा वर्षांत झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५० व्याघ्र मृत्यू मध्य प्रदेशात झाले. त्यापाठाेपाठ १७४ मृत्यूंसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक वाघ या दाेन राज्यांतच आहेत, हेही विशेष. त्यानंतर कर्नाटक १२७, उत्तराखंड ९३, तामिळनाडू ६२ व आसाम ६० या राज्यांचा क्रमांक लागताे.

२०२२ च्या दाेन महिन्यांत २४ मृत्यू

२०२१ साली देशभरात १२७ वाघ मरण पावले हाेते. त्यापैकी ४२ मध्य प्रदेश व २७ महाराष्ट्रात हाेते. २०२२ मध्ये आतापर्यंत दाेन महिन्यांत २४ वाघांचे मृत्यू झाले. यात दाेन्ही राज्यात प्रत्येकी ६ बळी गेले. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार ताडाेबा अंधारी प्रकल्पात आठ वर्षांत १८ मृत्यू, पेंच महाराष्ट्रात १२, मेळघाटात ११ व नवेगाव नागझिरा अभयारण्यात २ मृत्यूची नाेंद आहे.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव