शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

जागतिक वन्यजीव दिवस विशेष; २०० वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 07:00 IST

Nagpur News २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे.

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पात ५५ टक्के मृत्यू

निशांत वानखेडे

नागपूर : मागील काही वर्षांत वाघांची संख्या वाढण्यासह व्याघ्र शिकारीवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, मागील १० वर्षांचे आकडे पाहता २०० च्यावर वाघांचे बळी शिकाऱ्यांनी घेतले आहेत. २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे. भारतात वन्यजीवांच्या निसर्गचक्रात वाघ हा प्रमुख घटक असल्याने त्याचे महत्त्व कायम अधाेरेखित हाेत आले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी १००८ वाघांचा मृत्यू झाला. २०२० पर्यंत ४१७ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या काळात १०८ वाघांचा बळी गेला. ४४ अनैसर्गिक तर ७३ वाघ उपचारादरम्यान मृत पावले. २०२० पर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या आत ४७८ म्हणजे ५५.७८ टक्के वाघांचा जीव गेला. व्याघ्र प्रकल्पाबाहेर २७१ म्हणजे ३१.६२ टक्के, तर १२.६० टक्के विजेच्या धक्क्याचे बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी ८८.९१ टक्के प्रकरणे शवविच्छेदन व फाॅरेन्सिक अहवालानंतर बंद करण्यात आली असून, ११.०९ टक्के प्रकरणे प्रलंबित असल्याचा एनटीसीएचा अहवाल आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

२०१२ ते २०२२ पर्यंत दहा वर्षांत झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५० व्याघ्र मृत्यू मध्य प्रदेशात झाले. त्यापाठाेपाठ १७४ मृत्यूंसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक वाघ या दाेन राज्यांतच आहेत, हेही विशेष. त्यानंतर कर्नाटक १२७, उत्तराखंड ९३, तामिळनाडू ६२ व आसाम ६० या राज्यांचा क्रमांक लागताे.

२०२२ च्या दाेन महिन्यांत २४ मृत्यू

२०२१ साली देशभरात १२७ वाघ मरण पावले हाेते. त्यापैकी ४२ मध्य प्रदेश व २७ महाराष्ट्रात हाेते. २०२२ मध्ये आतापर्यंत दाेन महिन्यांत २४ वाघांचे मृत्यू झाले. यात दाेन्ही राज्यात प्रत्येकी ६ बळी गेले. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार ताडाेबा अंधारी प्रकल्पात आठ वर्षांत १८ मृत्यू, पेंच महाराष्ट्रात १२, मेळघाटात ११ व नवेगाव नागझिरा अभयारण्यात २ मृत्यूची नाेंद आहे.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव