शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जागतिक हवामान दिन; पावसाच्या दिवसांसोबतच तापमान २ डिग्रीपर्यंत वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 07:00 IST

Nagpur News हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे.

ठळक मुद्देहवामान बदलाचे जिल्हावार संशोधन

निशांत वानखेडे/सचिन लुंगसे

नागपूर/मुंबई : हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. गुड न्यूज हे आहे की, देशात राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पावसाच्या वार्षिक हंगामात ३ ते ९ दिवसांची वाढ हाेणार आहे. सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाणही वाढणार असून अत्याधिक पावसाच्या घटनांमध्येही वाढ हाेणार आहे.

आयपीसीसी, भारतीय हवामान विभाग व जागतिक हवामान अभ्यासक संस्थांनी १९९० ते २०१९ या ३० वर्षात बदललेल्या हवामानाचा अभ्यास करून २०३० पर्यंतचे प्राेजेक्शन ठेवत २०५० पर्यंतचे अनुमान मांडले आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेने या अहवालातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे.

मान्सूनचे ३ ते ९ दिवस वाढतील

- प्रदूषणाची तीव्रता (कार्बन उत्सर्जन) सध्याच्या प्रमाणापेक्षा वाढली, तर राज्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस ३ ते ९ दिवसांनी वाढेल.

- वाशिम ९, जालना ८, चंद्रपूर, गडचिराेली, अहमदनगर, सातारा, नंदूरबार ७ दिवस, नागपूर, अकाेला, बुलडाणा, पुणे, सांगली, वर्धा ५ दिवस, उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस.

- वाढत्या प्रदूषणाच्या अनुमानानुसार सर्व जिल्ह्यांत २ ते ८ दिवस पाऊस वाढणार. मुंबई ७, चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा ६ दिवस.

- पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्क्यांनी वाढेल. गाेंदिया १ टक्के तर पुण्यात २९ टक्क्यांनी वाढेल. अत्याधिक प्रदूषण झाले तर गाेंदिया ३ टक्के व पुणे ३४ टक्के. चंद्रपूर १५ टक्के.

- सर्वाधिक पावसाची सरासरी वाढणारे जिल्हे- अकाेला १७ ते २५ टक्के, भंडारा १५ ते २० टक्के, नाशिक १५ ते १६ टक्के, रत्नागिरी १७ ते २० टक्के, सातारा १९ ते २४ टक्के, साेलापूर १५ ते १९ टक्के, वर्धा १९ ते २२ टक्के, यवतमाळ १७ ते १९ टक्के.

अति पावसाचा धाेका

- भंडारा वगळता सर्व जिल्ह्यात अति पावसाच्या (५१-१०० मिमी/दिवस) घटनांमध्ये १ ते ५ दिवसाची वाढ.

- सिंधुदुर्ग ५, बुलडाणा ४, हिंगाेली, लातूर, बीड, साेलापूर, औरंगाबाद ३ घटना. २० जिल्ह्यांत २ घटना तर ८ जिल्ह्यांत १ घटना.

- अति प्रदूषणाच्या परिस्थितीत अति पावसाच्या घटना २ ते ८ दिवस वाढणार. सिंधुदुर्ग ८, बुलडाणा, हिंगाेली ५, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, काेल्हापूर, नांदेड, परभणी, सांगली, साेलापूर, वाशिम ४ घटना. १५ जिल्ह्यात ३ तर ८ जिल्ह्यात २ घटना.

- अतिशय माेठ्या पावसाच्या घटना मुंबईत ३, तर उर्वरित जिल्ह्यात २ घटना वाढतील.

 

प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.

तापमान वाढीमुळे आणि हवामान बदलामुळे कमी काळात अधिक पाऊस पडेल. नागरिकाच्या विस्थापनाच्या समस्या निर्माण होतील. पिकांची नासाडी व कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान होईल. वने, वन्यजीव आणि एकूणच परिसंस्थेवर परिणाम होईल. वेगवेगळ्या विषाणू व जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून आराेग्यावर गंभीर परिणाम हाेतील. कामाचे तास, अर्थव्यवस्था आणि विकासकामांवर गंभीर परिणाम दिसून येतील. त्यामुळे नियाेजन करण्याची अत्याधिक आवश्यकता आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान