शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हवामान दिन; पावसाच्या दिवसांसोबतच तापमान २ डिग्रीपर्यंत वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 07:00 IST

Nagpur News हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे.

ठळक मुद्देहवामान बदलाचे जिल्हावार संशोधन

निशांत वानखेडे/सचिन लुंगसे

नागपूर/मुंबई : हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. गुड न्यूज हे आहे की, देशात राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पावसाच्या वार्षिक हंगामात ३ ते ९ दिवसांची वाढ हाेणार आहे. सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाणही वाढणार असून अत्याधिक पावसाच्या घटनांमध्येही वाढ हाेणार आहे.

आयपीसीसी, भारतीय हवामान विभाग व जागतिक हवामान अभ्यासक संस्थांनी १९९० ते २०१९ या ३० वर्षात बदललेल्या हवामानाचा अभ्यास करून २०३० पर्यंतचे प्राेजेक्शन ठेवत २०५० पर्यंतचे अनुमान मांडले आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेने या अहवालातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे.

मान्सूनचे ३ ते ९ दिवस वाढतील

- प्रदूषणाची तीव्रता (कार्बन उत्सर्जन) सध्याच्या प्रमाणापेक्षा वाढली, तर राज्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस ३ ते ९ दिवसांनी वाढेल.

- वाशिम ९, जालना ८, चंद्रपूर, गडचिराेली, अहमदनगर, सातारा, नंदूरबार ७ दिवस, नागपूर, अकाेला, बुलडाणा, पुणे, सांगली, वर्धा ५ दिवस, उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस.

- वाढत्या प्रदूषणाच्या अनुमानानुसार सर्व जिल्ह्यांत २ ते ८ दिवस पाऊस वाढणार. मुंबई ७, चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा ६ दिवस.

- पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्क्यांनी वाढेल. गाेंदिया १ टक्के तर पुण्यात २९ टक्क्यांनी वाढेल. अत्याधिक प्रदूषण झाले तर गाेंदिया ३ टक्के व पुणे ३४ टक्के. चंद्रपूर १५ टक्के.

- सर्वाधिक पावसाची सरासरी वाढणारे जिल्हे- अकाेला १७ ते २५ टक्के, भंडारा १५ ते २० टक्के, नाशिक १५ ते १६ टक्के, रत्नागिरी १७ ते २० टक्के, सातारा १९ ते २४ टक्के, साेलापूर १५ ते १९ टक्के, वर्धा १९ ते २२ टक्के, यवतमाळ १७ ते १९ टक्के.

अति पावसाचा धाेका

- भंडारा वगळता सर्व जिल्ह्यात अति पावसाच्या (५१-१०० मिमी/दिवस) घटनांमध्ये १ ते ५ दिवसाची वाढ.

- सिंधुदुर्ग ५, बुलडाणा ४, हिंगाेली, लातूर, बीड, साेलापूर, औरंगाबाद ३ घटना. २० जिल्ह्यांत २ घटना तर ८ जिल्ह्यांत १ घटना.

- अति प्रदूषणाच्या परिस्थितीत अति पावसाच्या घटना २ ते ८ दिवस वाढणार. सिंधुदुर्ग ८, बुलडाणा, हिंगाेली ५, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, काेल्हापूर, नांदेड, परभणी, सांगली, साेलापूर, वाशिम ४ घटना. १५ जिल्ह्यात ३ तर ८ जिल्ह्यात २ घटना.

- अतिशय माेठ्या पावसाच्या घटना मुंबईत ३, तर उर्वरित जिल्ह्यात २ घटना वाढतील.

 

प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.

तापमान वाढीमुळे आणि हवामान बदलामुळे कमी काळात अधिक पाऊस पडेल. नागरिकाच्या विस्थापनाच्या समस्या निर्माण होतील. पिकांची नासाडी व कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान होईल. वने, वन्यजीव आणि एकूणच परिसंस्थेवर परिणाम होईल. वेगवेगळ्या विषाणू व जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून आराेग्यावर गंभीर परिणाम हाेतील. कामाचे तास, अर्थव्यवस्था आणि विकासकामांवर गंभीर परिणाम दिसून येतील. त्यामुळे नियाेजन करण्याची अत्याधिक आवश्यकता आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान