शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

भारतात सर्वाधिक क्षयरुग्ण; दर सहा मिनिटाला होतो एका व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 11:08 IST

२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे.

ठळक मुद्देजागतिक क्षयराेग दिनडाॅक्टरांचे मत : टीबी निर्मूलनासाठी काेराेनासारखे अभियान आवश्यक

मेहा शर्मा

नागपूर : क्षयराेग हा जगातील सर्वाधिक जीवघेणा आजार आहे आणि भारत हा जगात सर्वाधिक टीबी रुग्णसंख्या असलेला देश आहे. देशात दर ६ मिनिटाला एक असे दिवसाला २४० व्यक्तींचा क्षयराेगाने मृत्यू हाेताे.

२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे. यात ६१.७ टक्के पुरुष रुग्ण आहेत. त्यातही १५ ते ३० वयाेगटातील रुग्णांची संख्या ३८ टक्के, तर ५.६५ टक्के मुलांचा समावेश आहे.

पाहणीनुसार २०१९ साली २३,२८,३३८ क्षयराेग रुग्णांची नाेंद झाली. ८२ टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाले तर मृत्युदर ४ टक्के हाेता. ३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू करूनही अपयश आले तर ९ टक्के रुग्णांचे मूल्यांकन केले गेले नाही. तज्ज्ञांच्या मते, भारत क्षयरोगात आघाडीवर असण्यामागे बरीच कारणे आहेत. पल्मोनोलॉजी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मते साथीच्या रोगाला आळा घालण्यात असमर्थ असण्याची अनेक कारणे आहेत. ४० टक्के भारतीय संसर्गाच्या संपर्कात आहेत, परंतु प्रतिकारशक्तीमुळे ते वाचले आहेत.

आजाराच्या प्रसारामध्ये सामाजिक-आर्थिक कारणे महत्त्वाची आहेत. गजबजलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग वेगाने हाेताे. मद्यपी, धूम्रपान करणारे लाेक क्षयरोगाच्या औषधांना प्रतिसाद देत नसल्याने उपचार कठीण होतात. सरकारच्या याेजनानंतरही टीबीचे निर्मूलन हाेऊ शकले नाही, कारण प्रभावित क्षेत्राची ओळख करण्यात येत नाही, त्यामुळे रुग्ण पुन्हा संसर्गात येतात.

फिजिशियन डाॅ. हेमंत छाजेड यांच्या मते समाजातील खालच्या स्तरापर्यंत पाेहोचण्यासाठी घराेघरी जाऊन तपासणीचा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. रुग्णांनी काळजी घेतल्यास टीबी निर्मूलन शक्य आहे. आपल्याला मृ्त्यूचा आकडा गंभीरतेने घेण्याची गरज आहे. त्यासाठी काेराेनासारखी आक्रमक माेहीम राबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नाेंदविले.

टॅग्स :Healthआरोग्यWorld Tuberculosis Dayजागतिक क्षयरोग दिन