शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारतात सर्वाधिक क्षयरुग्ण; दर सहा मिनिटाला होतो एका व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 11:08 IST

२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे.

ठळक मुद्देजागतिक क्षयराेग दिनडाॅक्टरांचे मत : टीबी निर्मूलनासाठी काेराेनासारखे अभियान आवश्यक

मेहा शर्मा

नागपूर : क्षयराेग हा जगातील सर्वाधिक जीवघेणा आजार आहे आणि भारत हा जगात सर्वाधिक टीबी रुग्णसंख्या असलेला देश आहे. देशात दर ६ मिनिटाला एक असे दिवसाला २४० व्यक्तींचा क्षयराेगाने मृत्यू हाेताे.

२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे. यात ६१.७ टक्के पुरुष रुग्ण आहेत. त्यातही १५ ते ३० वयाेगटातील रुग्णांची संख्या ३८ टक्के, तर ५.६५ टक्के मुलांचा समावेश आहे.

पाहणीनुसार २०१९ साली २३,२८,३३८ क्षयराेग रुग्णांची नाेंद झाली. ८२ टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाले तर मृत्युदर ४ टक्के हाेता. ३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू करूनही अपयश आले तर ९ टक्के रुग्णांचे मूल्यांकन केले गेले नाही. तज्ज्ञांच्या मते, भारत क्षयरोगात आघाडीवर असण्यामागे बरीच कारणे आहेत. पल्मोनोलॉजी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मते साथीच्या रोगाला आळा घालण्यात असमर्थ असण्याची अनेक कारणे आहेत. ४० टक्के भारतीय संसर्गाच्या संपर्कात आहेत, परंतु प्रतिकारशक्तीमुळे ते वाचले आहेत.

आजाराच्या प्रसारामध्ये सामाजिक-आर्थिक कारणे महत्त्वाची आहेत. गजबजलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग वेगाने हाेताे. मद्यपी, धूम्रपान करणारे लाेक क्षयरोगाच्या औषधांना प्रतिसाद देत नसल्याने उपचार कठीण होतात. सरकारच्या याेजनानंतरही टीबीचे निर्मूलन हाेऊ शकले नाही, कारण प्रभावित क्षेत्राची ओळख करण्यात येत नाही, त्यामुळे रुग्ण पुन्हा संसर्गात येतात.

फिजिशियन डाॅ. हेमंत छाजेड यांच्या मते समाजातील खालच्या स्तरापर्यंत पाेहोचण्यासाठी घराेघरी जाऊन तपासणीचा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. रुग्णांनी काळजी घेतल्यास टीबी निर्मूलन शक्य आहे. आपल्याला मृ्त्यूचा आकडा गंभीरतेने घेण्याची गरज आहे. त्यासाठी काेराेनासारखी आक्रमक माेहीम राबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नाेंदविले.

टॅग्स :Healthआरोग्यWorld Tuberculosis Dayजागतिक क्षयरोग दिन