शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; २१ ते ४० वयात सर्वाधिकआत्महत्येचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 10:58 IST

एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दोन वर्षात २१ ते ४० या तरुण वयोगटात ३९१ जण आत्महत्येस प्रवृत्त झाले होते. यात ७ विद्यार्थी, ६ शेतकरी, २२२ पुरुष तर १६९ महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांत ६९० जण आयुष्याला कंटाळलेले एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आकडेवारी

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात एकूण होणाऱ्या आत्महत्यांच्या १० टक्के आत्महत्या या एकट्या भारतात होतात. त्यातील जवळजवळ ४० टक्के आत्महत्या या चाळिशीच्या आतील तरुणांनी केलेल्या असतात. याच वयात आत्महत्येचे प्रयत्न करण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दोन वर्षात २१ ते ४० या तरुण वयोगटात ३९१ जण आत्महत्येस प्रवृत्त झाले होते. यात ७ विद्यार्थी, ६ शेतकरी, २२२ पुरुष तर १६९ महिलांचा समावेश आहे.नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एकजण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे. तज्ज्ञाच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो. याच उद्देशाने प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. बहुसंख्य रुग्णांना उपचाराखाली आणून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून नवे जीवन दिले जात आहे. मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत आत्महत्येचे विचार व आत्महत्येचा प्रयत्न केलेले ६९० रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आले. यात २५ विद्यार्थी, १९ शेतकरी, ३६४ पुरुष व ३१७ महिलांचा समावेश होता.

पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारीकुटुंबाचा गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकेडवारीनुसार गेल्या दोन वर्षांत ३१७ महिलांनी तर ३६१ पुरुषांनी आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. यात २१ ते ३० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या १२२ तर महिलांची संख्या ६६ होती, तर ३१ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या १०० तर महिलांची संख्या १०३ होती.

विद्यार्थ्यांमध्ये १० ते २० वयोगट धोकादायकमुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढतच आहे. यात १० ते २० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन वर्षात या वयोगटातील १८ तर २१ ते ३० या वयोगटात सात विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

४१ ते ५० वयोगटातील शेतकऱ्यांकडे द्या लक्षकर्जबाजारीपणा, नापिकी या गोष्टींना कंटाळून गेल्या दोन वर्षात १९ शेतकरी गळयाला दोरीचा फास लावण्याच्याच तयारीत होते. यात ४१ ते ५० वर्षे वयोगटातील सात शेतकऱ्यांचा समावेश होता. त्या खालोखाल ५१ ते ६० वर्षे वयोगटात पाच शेतकरी होते. तरुण वयोगट असलेल्या २१ ते ३० वर्षे वयोगटात तीन, ३१ ते ४० वयोगटात तीन तर ६० व त्यापेक्षा जास्त वयोगटात एक शेतकरी होता.

प्रादेशिक मनोरुग्णालयातील आत्महत्या प्रतिबंधक कक्षात गेल्या दोन वर्षात आलेल्या ६९० रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना उपचाराखाली आणले आहे. यातील २७२ रुग्ण पुर्णत: बरे झाले आहेत. १६७ रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित २५० रुग्णांवर उपचाराबाबत पाठपुरावा केला जात आहे. रुग्णालयातील ‘आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम’ अशा रुग्णांसाठीचे मोलाचे ठरले असून उपचारामुळे त्यांना नवे जीवन मिळत आहे.-डॉ. माधुरी थोरात, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य