शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:00 IST

Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.

ठळक मुद्देआयुष्याला कंटाळलेले होते ५० विद्यार्थी मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातील आकडेवारी

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात सर्वाधिक, ७४६ पुरुष व त्या खालोखाल ६२४ महिला आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांवर उपचार सुरू असून, ३४४ जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. (World Suicide Prevention Day; 1370 people on the verge of suicide)

कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून जनजागृती सुरू केली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी प्रयोगिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले. आज या कार्यक्रमाला ११ वर्षे होत आहेत. याचा फायदा शेकडो रुग्णांना होत आहे. आता हाच कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर मनोरुग्णालयाच्या मार्गदर्शनात सर्वच जिल्ह्यात राबविला जात आहे.

-५४ टक्के पुरुषांकडून आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. एप्रिल २०१७ ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत ५४ टक्के म्हणजे, ७४६ पुरुषांमध्ये आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न केला.

 

-११ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना सांभाळा

मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढत आहे. यात ११ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षात ११ ते २० या वयोगटात ३६, तर २१ ते ३० या वयोगटात १४ असे ५० विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

- पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी

कुटुंबांच्या गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. गेल्या चार वर्षांत ११ ते २० या वयोगटात ८०, २१ ते ३० वयोगटात ३६६, ३१ ते ४० वयोगटात ४०६ असे एकूण ८५२ तरुण आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.

- डायल करा १०४ क्रमांक

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहेत. अशांसाठी १०४ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून मदत मागता येईल. या शिवाय प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा रुग्णालायत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ प्रकल्पातूनही मदत घेता येईल.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

 

टॅग्स :Deathमृत्यू