शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:00 IST

Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.

ठळक मुद्देआयुष्याला कंटाळलेले होते ५० विद्यार्थी मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातील आकडेवारी

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात सर्वाधिक, ७४६ पुरुष व त्या खालोखाल ६२४ महिला आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांवर उपचार सुरू असून, ३४४ जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. (World Suicide Prevention Day; 1370 people on the verge of suicide)

कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून जनजागृती सुरू केली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी प्रयोगिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले. आज या कार्यक्रमाला ११ वर्षे होत आहेत. याचा फायदा शेकडो रुग्णांना होत आहे. आता हाच कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर मनोरुग्णालयाच्या मार्गदर्शनात सर्वच जिल्ह्यात राबविला जात आहे.

-५४ टक्के पुरुषांकडून आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. एप्रिल २०१७ ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत ५४ टक्के म्हणजे, ७४६ पुरुषांमध्ये आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न केला.

 

-११ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना सांभाळा

मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढत आहे. यात ११ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षात ११ ते २० या वयोगटात ३६, तर २१ ते ३० या वयोगटात १४ असे ५० विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

- पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी

कुटुंबांच्या गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. गेल्या चार वर्षांत ११ ते २० या वयोगटात ८०, २१ ते ३० वयोगटात ३६६, ३१ ते ४० वयोगटात ४०६ असे एकूण ८५२ तरुण आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.

- डायल करा १०४ क्रमांक

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहेत. अशांसाठी १०४ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून मदत मागता येईल. या शिवाय प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा रुग्णालायत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ प्रकल्पातूनही मदत घेता येईल.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

 

टॅग्स :Deathमृत्यू