शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:00 IST

Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.

ठळक मुद्देआयुष्याला कंटाळलेले होते ५० विद्यार्थी मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातील आकडेवारी

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात सर्वाधिक, ७४६ पुरुष व त्या खालोखाल ६२४ महिला आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांवर उपचार सुरू असून, ३४४ जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. (World Suicide Prevention Day; 1370 people on the verge of suicide)

कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून जनजागृती सुरू केली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी प्रयोगिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले. आज या कार्यक्रमाला ११ वर्षे होत आहेत. याचा फायदा शेकडो रुग्णांना होत आहे. आता हाच कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर मनोरुग्णालयाच्या मार्गदर्शनात सर्वच जिल्ह्यात राबविला जात आहे.

-५४ टक्के पुरुषांकडून आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. एप्रिल २०१७ ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत ५४ टक्के म्हणजे, ७४६ पुरुषांमध्ये आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न केला.

 

-११ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना सांभाळा

मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढत आहे. यात ११ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षात ११ ते २० या वयोगटात ३६, तर २१ ते ३० या वयोगटात १४ असे ५० विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

- पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी

कुटुंबांच्या गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. गेल्या चार वर्षांत ११ ते २० या वयोगटात ८०, २१ ते ३० वयोगटात ३६६, ३१ ते ४० वयोगटात ४०६ असे एकूण ८५२ तरुण आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.

- डायल करा १०४ क्रमांक

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहेत. अशांसाठी १०४ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून मदत मागता येईल. या शिवाय प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा रुग्णालायत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ प्रकल्पातूनही मदत घेता येईल.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

 

टॅग्स :Deathमृत्यू