शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अंशुजा किंमतकर यांच्या शुभेच्छापत्रांचा एक विश्वविक्रम असाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 20:22 IST

टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात साकारली ५०२ शुभेच्छापत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) : टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वर्णेकर सभागृहात १९ एप्रिलच्या सकाळी ८ वाजता त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. २० एप्रिलच्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांनी ही शुभेच्छापत्रेसाकारली.‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनचे अध्यक्ष पवन सोलंकी यांनी शनिवारी या विश्वविक्रमाची घोषणा केली. अंशुजा यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. रामटेक येथे झालेल्या समारंभात सोलंकी यांनी अंशुजा यांना याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. अंशुजा यांनी १७ वर्षांपासून टाकाऊ वस्तू वापरून शुभेच्छापत्रे तयार करण्याचा छंद जोपासला होता. यातून त्यांनी आजपर्यंत अडीच हजार शुभेच्छापत्रांचा संग्रह केला आहे. अंशुजा यांनी काही महिन्यंपूर्वी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनकडे विश्वविक्रमासंबंधी पत्रव्यवहार केला होता. २४ तासात किमान ४०० शुभेच्छापत्रे तयार करणे हा विश्वविक्रम होऊ शकतो, अशी माहिती त्यांना या संस्थेकडून मिळाली होती. त्यानुसार अंशुजा यांनी सलग २४ तास शुभेच्छापत्रे तयार करण्याचा व विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. 

१९ एप्रिलला सकाळी ८ वाजतापासून त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनच्या टीमच्या उपस्थित विश्वविक्रमाला सुरुवात केली. सलग २४ तास दिवस व रात्र त्यांनी शुभेच्छापत्रे तयार केली.

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठnagpurनागपूर