शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

 जागतिक रेडिओ दिवस; क्रिकेटची कॉमेंट्री असो वा आवडती फिल्मी गाणी, आपला ‘रेडू’ आठवतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 07:00 IST

Nagpur News भारतात आजही रेट्रो काळातील जुन्या फिल्मी गाण्यांसाठी म्हणून रेडिओ ओळखला जातो. रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हेच समीकरण ठरलेले आहे.

ठळक मुद्देमोबाईल, स्मार्टवॉचसारख्या आधुनिक गॅझेट्समध्ये गहाळ झाली जुनी ओळख

नागपूर : भारतीय क्रिकेट टीमच्या १९८३च्या कर्तृत्त्वावर आधारित ‘८३’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यातील रेडिओवरील भन्नाट क्रिकेट कॉमेंट्रीचा ज्वर बघून जुन्या काळातील स्मृतींना उजाळा मिळाला. रेडिओ म्हणजे तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्ती आणि त्या काळातील लाईव्ह घटनाक्रमांचा दुवा होता आणि त्याबाबतची उत्सुकता कशी शिगेला पोहोचत होती, ही बाब आजही वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठांकडून वर्तमान पिढीला कळते. भारतात आजही रेट्रो काळातील जुन्या फिल्मी गाण्यांसाठी म्हणून रेडिओ ओळखला जातो. रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हेच समिकरण ठरलेले आहे. मात्र, रेडिओ हे एक गॅझेट असून, आज त्या यंत्राची जागा स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, स्मार्टपेन आदींनी घेतली आहे.

रेडिओचा शोध

रेडिओचा शोध १८८५ साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते. रेडिओ म्हणजे बिनतारी ध्वनीतरंग संदेशवहन यंत्रणा होय आणि या साधनाचा उपयोग त्यापूर्वीही संदेशवहनासाठी केला जात असल्याचे आढळून येते. रेडिओच्या प्रत्यक्ष वापराची सुरुवात वैज्ञानिक रेगिनाल्ड फेसेंडेन याने २४ डिसेंबर १९०६ रोजी केली होती. त्यानंतर १९१८मध्ये ली द फॉरेस्टने न्यूयॉर्कच्या हायब्रीज क्षेत्रात जगातील पहिले रेडिओ स्टेशन सुरू केले होते.

भारतात रेडिओची सुरुवात

भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली. १९३५च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीवेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले आणि १९३६मध्ये शासकीय ‘इम्पीरियल रेडिओ ऑफ इंडिया’ची सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर याचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ किंवा ‘आकाशवाणी’ असे झाले. रेडिओच्या विस्तारात भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बसू यांचे योगदान महत्त्वाचे असून, रेडिओ व सूक्ष्म तरंगांवर कार्य करणारे ते पहिले वैज्ञानिक होत. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. १५ ऑगस्ट १९५१मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आकाशवाणीतून प्रसारित झाले होते.

‘मन की बात’ने लोकप्रियतेत भर

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओद्वारे जनसंवादाची क्षमता ओळखत ३ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर रेडिओच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. दर महिन्यात ते रेडिओवरून नागरिकांशी संवाद साधत असतात.

आकाशवाणीची सेवा ९१ टक्के भागात

सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्र आहेत. त्यापैकी १४८ केंद्र ही मध्यमतरंग, ५४ केंद्र ही लघुतरंग तर उरलेली १६८ ही एफ. एम. केंद्र आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या ९१ टक्के भागात सेवा पुरविते. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.

- कविता फाले बोरीकर, माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर

........

टॅग्स :historyइतिहास