शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

 जागतिक पार्किन्सन दिन; ६५ वर्षांवरील १०० रुग्णांमध्ये एक पार्किन्सनचा रुग्ण

By सुमेध वाघमार | Updated: April 11, 2023 08:00 IST

Nagpur News भारतात ६५ वर्षांवरील १०० लोकांमध्ये ‘पार्किन्सन’ (कंपवात) या रोगाचा एक रुग्ण आढळून येतो. अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे.

नागपूर : ‘पार्किन्सन’ (कंपवात) हा एक मेंदूचा रोग आहे. आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील द्रव्य ‘निग्रा सेल्स’मधील ‘डोपेमाईन’ कमी झाल्याने हा रोग होतो. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव टाकतो. भारतात ६५ वर्षांवरील १०० लोकांमध्ये या रोगाचा एक रुग्ण आढळून येतो. अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे. याचे प्रमाण फार कमी आहे, आणि कारणेही वेगळी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- दहा वर्षांनंतर पार्किन्सनचे रुग्ण दुप्पट

जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. आयुर्मान वाढत असल्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहे. आपल्या देशात या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आढळून येतात. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषामध्ये याचे प्रमाण दीडपटीने अधिक आहे.

- २५ टक्के निदान चुकीचे

पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णाचे निदान चुकीचे होते. दर्जेदार न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्न करता येतो. हा रोग पूर्णत: बरा होत नाही, परंतु योग्य औषधाने नियंत्रणात आणता येतो.

- पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षणे म्हणजे कंपन-डॉ. मेश्राम 

न्यूरो फिजिशियन डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरू होतो आणि नंतर हळूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. यात हाथ, पाय कडक होतात. पाठीचा कणा वाकतो. चालण्यामध्ये अडचण होते. अचानक खाली पाडण्याचे धोका निर्माण होतो. लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो, अक्षर वेडेवाकडे होतात. स्वाक्षरीमध्ये बदल होतो. तोंडातून लाळ सांडते. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ट्पणा वाढते. चिंता आणि नैराश्य आल्याने जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार महत्त्वाचे ठरतात.

- ८० टक्के रुग्णांवर औषधोपचार शक्य - डॉ. अग्रवाल 

न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, जवळपास ८० टक्के रुग्णांचे पार्किन्सन औषधोपचाराने नियंत्रणात आणणे शक्य आहे. परंतु जे रुग्ण उपचार करूनही नियंत्रणाबाहेर राहतात, रोजचे दैनंदिन कार्यही करणे त्यांना अवघड जाते व तरुण आहेत अशा रुग्णांना ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ शस्त्रक्रिया फायद्याची ठरते. यात हृदयात जसा पेसमेकर बसविला जातो, तसा पेसमेकर मेंदूत बसविला जातो. आणि हातात त्याचे ‘रिमोट’ असते. गरजेनुसार रिमोटच्या मदतीने ‘पॉवर’ वाढविता येतो. जसे चालायचे असेल तसे त्याचा ‘पॉवर’ वाढवायचा आणि झोपायचे असेल तर तो कमी करायचा.

- ही आहेत लक्षणे

:: शरीरात कंपन सुटणे

:: सर्वच हालचाली मंदावणे

:: लिहिण्यात अडचणी येणे

:: बोलण्यात फरक पडणे

:: चालताना सुरुवातीला अडचण येणे आणि चालायला लागल्यास धावायला लागल्यासारखे चालणे

:: चालताना तोल जाणे, हातपायाला कडकपणा आदी या रोगाची लक्षणे दिसून येतात.

टॅग्स :Healthआरोग्य