शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अवयवदान दिवस : राज्यात अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:14 IST

अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. या सहा वर्षांत ५२ मेंदुमृत व्यक्तीने १४४ अवयवांचे दान केले आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांत १४४ अवयवांची मदत : ५२ मेंदुमृत व्यक्तीकडून दान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात बुडाले असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळत आहे. त्यांच्या जीवनात नवा आनंद भरला जात आहे. नागपुरात हा प्रयत्न २०१३ पासून सुरू झाला. आज अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. या सहा वर्षांत ५२ मेंदुमृत व्यक्तीने १४४ अवयवांचे दान केले आहे.मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदान महादान आहे. मात्र मागणी व पुरवठा यात कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. सध्याच्या स्थितीत भारतात दीड लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ पाच हजार मूत्रपिंड उपलब्ध होतात. ५० हजार हृदयाची गरज असताना १०-१५ मिळतात तर ५० हजार यकृताची गरज असताना ७०० उपलब्ध होतात. परिणामी, एका-एका अवयवांसाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे वास्तव आहे. ही संख्या कमी करण्यासाठी २०१३ मध्ये नागपुरात पहिल्यांदाच ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीसी) नागपूरची स्थापना झाली. या सेंटरचे पहिले अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. बी.जी. वाघमारे तर सचिव डॉ. रवी वानखेडे होते. त्यांच्या विशेष प्रयत्नातून नागपुरात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. नागपुरात पहिले अवयवदान अमित सिंग या १८ वर्षीय ‘ब्रेनडेड’ तरुणाकडून झाले. नंतर ही चळवळ वाढत गेली. डॉ. विभावरी दाणी या अध्यक्षस्थानी तर समन्वयिका म्हणून वीणा वाठोरे रुजू झाल्यावर गती आली. मेंदुमृत (ब्रेनडेड) व्यक्तीच्या अवयवदानात राज्यात नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आले. पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्यावर पुणे तर चौथ्यावर औरंगाबाद आहे.२०१८ मध्ये १८ व्यक्तींकडून अवयवदान‘झेडटीसीसी’च्या प्रयत्नातून २०१३ मध्ये अवयवदानाला सुरुवात झाली. या वर्षी केवळ एकाच व्यक्तीकडून अवयवदान झाले. मात्र, त्यानंतर अवयवदानाची ही चळवळ वाढत गेली. २०१४ मध्ये तीन, २०१५ मध्ये चार, २०१६मध्ये सहा, २०१७ मध्ये १४ तर २०१८ मध्ये १८ ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदान करण्यात आले. जानेवारी ते जून २०१९ पर्यंत सात असे ५३ व्यक्तींकडून अवयवदान झाले.९३ मूत्रपिंड, १३ हृदय, ३८ यृकत, दोन फफ्फुसाचे दान२०१३ ते जुलै २०१९ या कालावधीत ९३ मूत्रपिंड काढण्यात आले. यातील ९१ मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नागपूर विभागात तर दोन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण मुंबई विभागात करण्यात आले. याच कालावधीत ११ हृदय काढण्यात आले. यातील तीन चेन्नई, एक दिल्ली, सात मुंबईत तर एक हृदय प्रत्यारोपण नागपूर विभागात करण्यात आले. गेल्या सहा वर्षांत ३८ यकृत काढण्यात आले. यातील पाच पुणे, एक औरंगाबाद, आठ मुंबई तर गेल्या दोन वर्षांत नागपूर विभागात २६ यृकताचे प्रत्यारोपण झाले. आतापर्यंत कवेळ दोनच फुफ्फुसाचे दान झाले. यातील एक मुंबई तर दुसरे तेलंगणा विभागात प्रत्यारोपण झाले.लवकरच स्वादुपिंड प्रत्यारोपणनागपूर विभागांतर्गत १० हॉस्पिटल नोंदणीकृत असून त्यांना अवयव प्रत्यारोपणाला मंजुरी मिळाली आहे. उपराजधानीत लवकरच स्वादुपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू होणार आहे. नागपूर विभागात एकाच रुग्णाला यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले तर दुसऱ्या एका रुग्णाला दोन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.२३ वेळा झाले ग्रीन कॉरिडोअर‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. तसेच यकृतासाठी सहा तास, फुफ्फुसांसाठी सहा तास आणि मूत्रपिंडासाठी ४८ तासांचा अवधी असतो. यामुळे ‘ग्रीन कॉरिडोअर’ महत्त्वाचे ठरते. नागपुरात हे ‘ग्रीन कॉरिडोअर’ वाहतूक पोलिसांच्या मदतीने २३ वेळा झाले.अंधश्रद्धा, धार्मिक रुढी, परंपरेमुळे अवयवदानाचे प्रमाण कमी 

वेळेत अवयव दानासाठी दाता मिळाला असता व अवयव प्रत्यारोपण झाले असते तर कदाचित ते वाचले असते, असे वृत्त वाचतो, ऐकतो, हळहळतो. मात्र, घरच्याच कुणा व्यक्तीचे ‘ब्रेनडेड’ झाल्यास अवयव दान करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. आज भारतात हजारो लोक अवयव दानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. अंधश्रद्धा, धार्मिक रुढी व परंपरा या कारणांमुळे अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. ते वाढणे आवश्यक झाले आहे.डॉ. रवी वानखेडेसचिव, झेडटीसीसी नागपूर

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर